
ARMY (फोटो सौजन्य- pinterest)
भारतीय सैन्य भरतीसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीचे निकष शिथिल करण्याची कोणतीही योजना असल्याचा आरोप संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. द्रमुक खासदार कलानिधी वीरस्वामी यांनी विचारले होते की, भारतीय सैन्यात भरतीसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीचे निकष कमी करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का? त्यावर संरक्षण मंत्री संजय सेठने या वर लिखित उत्तर देत म्हंटले आहे कि भारतीय सेनेमध्ये असं कोणताच प्रस्ताव नाही पाठवला आहे. चला जाणून घेऊयात अग्नीवर भरतीचे सध्याचे काय नियम आहे.
शारीरिक चाचणी
ग्रुप १ – साडेपाच मिनिटात १.६ किलोमीटर धावावे लागेल. यासाठी ६० गुण देण्यात येणार. १० पुल-अप्स करावे लागतील. या साठी ४० गुण असेल.
ग्रुप २ – ५ मिनिटे ४५ सेकंदात १.६ किमी धावावे लागेल. त्याला ४८ गुण असतील. पुल अप्स ९ वेळा करावे लागतील ज्यासाठी ३३ गुण असतील.
ग्रुप ३ – ६ मिनिटांत १.६ किमी धावावे लागेल. त्याला ३६ गुण असतील. पुल अप्स ८ वेळा करावे लागतील ज्यासाठी २७ गुण असतील.
ग्रुप ४ – १.६ किमी ६ मिनिटे १५ सेकंदात धावावे लागेल. त्याला २४ गुण असतील. ७ वेळा पुल अप्स करावे लागतील ज्यासाठी २१ गुण असतील. जो व्यक्ती ६ पुल-अप करतो त्याला १६ गुण मिळतील.
वरील सगळ्या ग्रुपमध्ये फक्त दोन गोष्टी पात्रता असतील