
crime(फोटो सौजन्य-social media)
कसं झाला अपघात?
पालघरच्या धानिवारी येथून वऱ्हाडाचा ट्रक येत होता. तेव्हा त्याच्याच विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर ट्रक त्याला आढळला. यामुळे भीषण अपघात झाला. कंटेनरचा मागील डब्बा निसटला, त्यानंतर ट्रक वर तो आढळला. कंटेनर धडकल्याने होत्याचं नव्हतं झालं. कंटेनरच्या या धडकेत वऱ्हाडाचा ट्रक लांब फेकला गेला.
यावेळी ट्रकमध्ये 100 हून अधिक वऱ्हाडी असल्याची माहिती समोर आली आहे. बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाचा साखरपुडा होता यात साखरपुड्यासाठी वऱ्हाडी मंडळी ट्रक मधून जात होते. यावेळी घडलेल्या या अपघाताने परिसर हादरून गेला. तब्बल 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू आणि 20 ते 25 जण गंभीर जखमी या अपघातात झाले. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू
पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की रिक्षा चालकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर फॉर्च्युनर कार मध्ये असलेले तिघे जण गंभीर जखमी झाले. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेंगडे हे देखील होते. यांच्या देखील डोक्याला दुखापत झाली आहे.
विकास अर्जुन पारखे असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चंदू मुलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची भीषण धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की रिक्षा चालकाचा घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला. तर फॉर्च्यूनर मधील तिघेजण जखमी झाले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करायला सुरुवात केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातानंतर अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्यून चालकावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पौड पोलीस तपास करत आहेत.
Ans: हा भीषण अपघात पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घडला.
Ans: या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Ans: वऱ्हाडी मंडळी बालाराम दांडेकर यांच्या साखरपुड्यासाठी जात होती.