
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमक?
दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अकोल्यात एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करणाऱ्या रावणाचे नाव विठ्ठल संतोष बोर्डे असे आहे. विठ्ठल ने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस ठेवला होता त्यानंतर त्यांनी टोकाचा निर्णय उचलत स्वतःची जीवन यात्रा संपवली. विठ्ठल हा मूळचा अकोला जिल्ह्यातील शिंगोली गावातील रहिवासी आहे. त्याने कारंजा रमजानपूर येथील धरणात उडी घेत आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार विठ्ठलला 69 दहावीच्या परीक्षेत मिळाले होते.
स्टेटस मध्ये काय?
अगली बार आऊंगा सबका मनपसंद बंद कर असे लिहिलेले स्टेटस त्याने सोशल मीडियावर ठेवले होते. त्यानंतर स्वतःला त्याने धरणात झोकून दिले.
४ जणांची आत्महत्या
कमी गुण मिळाले नाही आत्तापर्यंत राज्य चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून या तीन मुलांनी एका मुलीचा समावेश आहे. विठ्ठल चे आत्महत्या ने अकोल्यात शोककळा पसरली असून खळबळ उडाली आहे.
नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार
नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. असे असताना अकोल्याच्या पातूर तालुक्यातील एका गावात असाच धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वृद्धाने शेजारी राहणाऱ्या एका 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
जगराम गोविंद आडे (वय ६०) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चान्नी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित बालिकेचे आई-वडील हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई-वडील कामावर गेल्यानंतर शाळेला सुटी असल्याने ती घरी एकटीच राहत होती. संधी साधून शेजारी राहणाऱ्या वृद्धाने अत्याचार केला. आरोपी बालिकेला धमकावत असल्याने ती भयभीत झाली. त्यामुळे हा प्रकार सुरुवातीलाच कुणालाच सांगितला नव्हता. मात्र, सातत्याने होणारा अत्याचार तिला असह्य झाला. मंगळवारी तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने चान्नी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर नराधम वृद्ध गावातून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
Ans: आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव विठ्ठल संतोष बोर्डे होते.
Ans: “अगली बार आऊंगा, सबका मनपसंद बन कर” असे स्टेटस त्याने ठेवले होते.
Ans: तिने सर्व विषयात नेमके 35 गुण मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.