
crime (फोटो सौजन्य: social media)
५ जणांचा मृत्य
हा अपघात इतका भीषण होता की यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा समावेश असून हे सर्वजण चंद्रपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे.
Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ
भिवंडीत मध्यरात्री आगीचा कहर; दोन ठिकाणी गोदामे जळाली, मोठं नुकसान
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात मध्यरात्रीच्या सुमारास आगीचा थरार पाहायला मिळाला. निंबवली आणि येवई गावांच्या हद्दीत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या आगीत अनेक गोदामे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पहिली घटना भिवंडी तालुक्यातील निंबवली गावाच्या हद्दीत टायर गोदाम, लाकडाची वखार आणि प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. मध्यरात्री 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तब्बल सात ते आठ गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळालगत गॅस एजन्सी असल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुसरी घटना याच रात्री येवई गावाच्या हद्दीत लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा असल्याने आग वेगाने पसरली आणि संपूर्ण वखार जळून खाक झाली. या गदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा होता. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
Ans: हा अपघात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 104 जवळ घडला.
Ans: या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ans: मृत झालेले सर्व प्रवासी चंद्रपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.