
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील आरोपीचे नाव निरज कुमार विलास चौधरी (31) असे आहे. मृत अभिनव कुमार एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्या महिलेचे लग्न आरोपी नीरज चौधरी याच्याशी ठरले होते. महिले नीराजसोबत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे आपला लग्न मोडण्यास अभिनव कुमार जबाबदार असल्याचा संशय निरजला आला. याच रागातून निरजने आपल्या साथीदारांच्या मदतीने अभिनवचा पाठलाग केला आणि त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी नीरज मुंबईतून पळून गेला होता. तो पकडला जाऊ नये म्हणून त्याने रेल्वेने अनेक ठिकाणी प्रवास केला.
१३ एप्रिल रोजी खेरवाडीतील कल्पतरू स्पार्कल परिसरात अभिनव कुमारचा मृतदेह सापडून आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी तांत्रिक सर्व्हेलन्सचा वापर केला. आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागपूर आणि कोलकाता येथे विशेष पथके रवाना केली.
कोलकाता एअरपोर्टवर थरारक कारवाई
आरोपी प्रथम रेल्वेने हावडा स्टेशनवर पोहोचला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने तिथूनही पळ काढला. शेवटी तो कोलकाता विमानतळावरून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. तांत्रिक कौशल्य आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या 60 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.
धक्कादायक! मिरा-भाईंदरमध्ये घरकामगार महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार
मुंबईच्या मिरा- भाईंदरमधील काशीमिरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४० वर्षीय घरकामगार महिलेची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव सुमन असे आहे. सुमन ही चंदेश अॅकॉर्ड या निवासी संकुलात अनेक घरांमध्ये घरकाम करत होती. मंगळवारी चंदेश अॅकॉर्ड बिल्डिंग क्रमांक 27 मधील एका घरात तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले असून, तिच्या पोटात दोन, छातीत एक आणि मानेवर एक असे गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला तात्काळ गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Beed Crime: लग्न आठवड्यावर असताना तरुण रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Ans: मुंबईतील वांद्रे, खेरवाडी परिसरात.
Ans: लग्नास नकार दिल्यामुळे आरोपीला राग आला आणि संशयातून खून केला.
Ans: तांत्रिक सर्व्हेलन्स आणि लोकेशन ट्रॅकिंगद्वारे कोलकाता विमानतळावर अटक केली.