
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
शेतकरी अशोक बांदल हे काही दिवसांपासून लग्नासाठी मुलीचा शोध घेत होते. याच दरम्यान अशोक यांची अरविंद राठोड नावाच्या व्यक्तीसोबत भेट झाली. अशोकने त्याच्याजवळ लग्नाची इच्छा व्यक्त केली. तर अरविंदने त्यांच्या गावाकडे चांगल्या मुलींची स्थळे असल्याचे सांगितले. त्याने व्हॉट्सअॅपवर दोन ते तीन मुलींचे फोटोही अशोकला पाठवले. त्यापैकी माया शिंदे नावाची मुलगी अशोक बांदलने पसंत केली होती. माया ही आपल्या आई आणि भावासोबत राहते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे असे अरविंदने अशोकला सांगितले. मात्र अरविंदने लग्न जुळवून देतांना एक अट घातली. ते म्हणजे लग्न करण्यासाठी 3 लाख रुपये स्त्रीधन द्यावे लागेल. अशोकने ते अट मान्य केली आणि लग्न करण्याचे ठरवले.
एकदा मुलाच्या नातेवाईकांना बोलवून मुलगी बघण्याचा कार्यक्रम उरकून घेण्याचे ठरले. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अशोक बांदल, त्याचा चुलतभाऊ आणि इतर नातेवाईक बजाजनगरातील अयोध्यानगरात सविता शिंदे यांच्या घरी गेले. तेथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. त्यांनतर छत्रपती संभाजीनगरातील; कोर्टात वकील शैला लालसरे यांच्या उपस्थितीत 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नवरदेव-नवरी स्वखुशीने विवाह करत असल्याची नोटरी केली. त्यानंतर ते सर्वजण पुन्हा सविता शिंदे यांच्या घरी परतले. अशोक बांदलने 1 लाख 45 हजार रुपये फोन पे द्वारे केले आणि 1 लाख 55 हजार रुपये रोख असे 3 लाख रुपये अरविंदला दिले.
अरविंदला पैसे मिळाल्यानंतर मुलीची आई सविता शिंदे यांनी मायाला आजच सोबत घ्या, उद्या गावाकडे लग्न लावून घेऊ” असे म्हंटले. त्यानुसार मायाला कारमध्ये बसवून सर्वच निघाले. पण काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून पांढरी कार ओव्हरटेक करून समोर आडवी लावली. ही कार विना क्रमांकाची होती. या कारमधून चार व्यक्ती उतरले. नवरदेव अशोकच्या कारमधून माया उतरली आणि त्या कार मध्ये बसली. काही क्षणात कार गायब आणि नावरीही गायब झाली. हे सगळं झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे अशोक बांदल यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहे.
Ans: सासरी जाताना उतरली आणि परत आलीच नाही.
Ans: मुलाकडून जवळपास 3 लाख रुपये घेऊन पळाली.
Ans: फसवणूक प्रकरणाची नोंद घेऊन संशयितांच्या लोकेशनचा शोध सुरू केला