
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये दीर्घ काळापासून जमीन वाद सुरु आहे. याच वादातून हा रक्तरंजित प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे २५ एकर जमिनीच्या व्यवहारातून हा वाद अधिक तीव्र झाला होता. निराळे कुटुंबाने ही जमीन प्रतिएकर १५ लाख रुपयांप्रमाणे खरेदी केली होती. मात्र, बाजारभाव जास्त असताना कमी दरात जमीन विकली गेल्याने गोळगी कुटुंब नाराज होते. संबंधित जमीन स्वतः खरेदी करण्याची इच्छा असलेल्या अप्पुगौडा गोळगी यांनी निराळे कुटुंबाला हा व्यवहार करू नये, अशी धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. तरीही जमीन व्यवहार पूर्ण झाला आणि यामुळेच गोळगी कुटुंबीय संतापले आणि त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाला.
निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिक स्तरावर मध्यस्थीची बैठकही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी जमीन वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आणखी एका बैठकीसाठी निराळे कुटुंबातील सदस्य आणि इतर काही जण गेले असता त्यांच्यावर हल्लेखोरांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार शस्त्रांचा या हल्ल्यात वापर झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात जवळपास ६ जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.
Pune Crime : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…
Ans: 25 एकर जमिनीच्या मालकी आणि खरेदी-विक्री व्यवहारावरून सुरू असलेला जुना वाद.
Ans: धारदार शस्त्रांनी हल्ला आणि गोळीबारात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला.
Ans: गावात कडेकोट बंदोबस्त तैनात करून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.