Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत भीषण हत्याकांड! 25 एकर जमिनीच्या वादातून 6 जणांचा खून, गोळीबार आणि…

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील गोविंदपूर येथे 25 एकर जमिनीच्या वादातून भीषण सामूहिक हत्याकांड घडले. धारदार शस्त्रे आणि गोळीबार करत सहा जणांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील भीमा नदी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 11:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 25 एकर जमिनीच्या व्यवहारावरून निराळे आणि गोळगी कुटुंबांतील वाद रक्तरंजित हत्याकांडात बदलला.
  • धारदार शस्त्रे व गोळीबारात माजी तालुका पंचायत सदस्यासह 6 जणांचा मृत्यू.
  • घटनेनंतर गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात; पुढील तपास सुरू.
विजापूर: विजापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून तब्बल ६ जणांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यानंतर गोळ्या झाडत हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा भीषण हत्याकांड महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत घडली. या भागातील जुन्या वैमनस्याच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील भाषा… लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला कंटाळली अन् तरुणीने ॲसिड पिऊन आयुष्य संपवलं

काय नेमकं प्रकरण?

निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये दीर्घ काळापासून जमीन वाद सुरु आहे. याच वादातून हा रक्तरंजित प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे २५ एकर जमिनीच्या व्यवहारातून हा वाद अधिक तीव्र झाला होता. निराळे कुटुंबाने ही जमीन प्रतिएकर १५ लाख रुपयांप्रमाणे खरेदी केली होती. मात्र, बाजारभाव जास्त असताना कमी दरात जमीन विकली गेल्याने गोळगी कुटुंब नाराज होते. संबंधित जमीन स्वतः खरेदी करण्याची इच्छा असलेल्या अप्पुगौडा गोळगी यांनी निराळे कुटुंबाला हा व्यवहार करू नये, अशी धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. तरीही जमीन व्यवहार पूर्ण झाला आणि यामुळेच गोळगी कुटुंबीय संतापले आणि त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाला.

निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिक स्तरावर मध्यस्थीची बैठकही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी जमीन वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आणखी एका बैठकीसाठी निराळे कुटुंबातील सदस्य आणि इतर काही जण गेले असता त्यांच्यावर हल्लेखोरांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. ऊस तोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार शस्त्रांचा या हल्ल्यात वापर झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात जवळपास ६ जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी चडचण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Pune Crime : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्याकांडाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: 25 एकर जमिनीच्या मालकी आणि खरेदी-विक्री व्यवहारावरून सुरू असलेला जुना वाद.

  • Que: या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: धारदार शस्त्रांनी हल्ला आणि गोळीबारात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला.

  • Que: घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: गावात कडेकोट बंदोबस्त तैनात करून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Web Title: Crime news brutal massacre near maharashtra karnataka border 6 murdered over a 25 acre land disputegunfire and more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात विषारी दारूचं थैमान! 15 जणांचा मृत्यू, पोलिस आयुक्तांचा दणका; अनेक अधिकारी निलंबित
1

Pune Crime: पुण्यात विषारी दारूचं थैमान! 15 जणांचा मृत्यू, पोलिस आयुक्तांचा दणका; अनेक अधिकारी निलंबित

Solapur Crime: ‘तुला जिवंत राहू देणार नाही’; सततच्या धमक्या, बेदम मारहाण… हातावर आरोपींची नावे लिहित 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या
2

Solapur Crime: ‘तुला जिवंत राहू देणार नाही’; सततच्या धमक्या, बेदम मारहाण… हातावर आरोपींची नावे लिहित 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime: ‘मी जिवंत आहे!’ तरुणीच्या एका वाक्याने हत्याकांडाचा संपूर्ण तपास उलटला; नेमकं काय प्रकरण?
3

Jalgaon Crime: ‘मी जिवंत आहे!’ तरुणीच्या एका वाक्याने हत्याकांडाचा संपूर्ण तपास उलटला; नेमकं काय प्रकरण?

Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं! ट्रॅव्हल्स-दुचाकीची समोरासमोर धडक, 4 तरुणांचा जागीच मृत्यू; ओळख पटवणंही कठीण
4

Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं! ट्रॅव्हल्स-दुचाकीची समोरासमोर धडक, 4 तरुणांचा जागीच मृत्यू; ओळख पटवणंही कठीण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.