Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंदेकर-गायकवाड टोळ्यांनी गुन्हेगारीतील ‘तो’ नियम मोडला; पोलिसही गेले चक्रावून

आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने नियम मोडला आहे. हा नियमभंग आता आणखी किती जणांचा जीव घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 09, 2025 | 11:48 AM
आंदेकर-गायकवाड टोळ्यांनी गुन्हेगारीतील 'तो' नियम मोडला; पोलिसही गेले चक्रावून

आंदेकर-गायकवाड टोळ्यांनी गुन्हेगारीतील 'तो' नियम मोडला; पोलिसही गेले चक्रावून

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : गुन्हेगारी विश्वात पाळला जाणारा एक अलिखीत नियम असतो. वैर-वैरातच ठेवायचे. कुटूंबिय, नातेवाईक, मित्र यांना स्पर्श करायचा नाही, अन् त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पहायचे नाही. सरकारी कायद्याप्रमाणेच हा नियम प्रत्येक टोळी पाळते. मात्र, आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने हा नियम मोडला आहे. गेल्या वर्षभरापासून दोन टोळ्यांच्या संघर्षाने कुटुंबियांना टार्गेट करण्याचा नवा ट्रेंड सुरू करून ‘गुन्हेगारीतला नो-फॅमिली रूल’ बाद ठरवला आहे. याच नियमभंगातून गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या दोन जणांचा बळी गेला. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ तर उडाली आहेच पण, हा नियमभंग आता आणखी किती जणांचा अशा पद्धतीने जीव घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्यातील गुन्हेगारीचा पॅटर्न तसा सर्वश्रुत आहे. राज्यभरात कोयता व गोळीबाराने खून करणे हा पुण्यातील गुन्हेगारीचा नवा पॅटर्न. या पॅटर्नमुळे खुनानंतर दहशतीचे सावट व निशाणी पाठिमागे ठेवली जाते. पुण्यातील गुन्हेगारी तशी लाठ्या-काठ्यांपर्यंतच मर्यादित होती. आता ती गोळीबार व कोयत्यापर्यंत गेली. पुण्याच्या गुन्हेगारीत सुरूवातीपासून आंदेकर टोळीचा सहभाग आहे. पहिली टोळी म्हणूनही या टोळीला ओळखतात. आंदेकर व माळदकर टोळीच्या संघर्षाचे आज देखील किस्से सांगितले जातात. तेव्हापासून गुन्हेगारी जगतातील वर्चस्व आंदेकर टोळीने राखल्याचे बोलले जाते. परंतु, आता गुन्हेगारीतल्या नियमभंगाची सुरूवातही याच टोळीपासून झाली म्हणावी लागेल.

गायकवाड-आंदेकर टोळीचा संघर्ष नजिकच्या काळातलाच. त्याला फार मोठा काही इतिहास नाही. आर्थिक सुबत्तेतून सोमनाथ गायकवाड-आंदेकरांत वाद-विवाद झाले. सोमनाथने स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत आंदेकर टोळीशी वाद घेतला. सोमनाथ आंबेगाव पठारचा. पण आंदेकर टोळीला बऱ्यापैकी ओळखणारा. गुन्हेगारीतला ‘सुरज’ टिकण्यासाठी त्याने संवगडीसोबत घेऊन टोळी निर्माण केली. आता या दोन टोळ्यांमध्ये टोकाचे वैमन्यास्य सुरू झाले आहे.

पुर्वइतिहास..!

आंदेकर-गायकवाड टोळीत टोकाचे युद्ध पेटले ते २०२३ पासून. ऑक्टोंबर २०२३ मध्ये निखील आखाडे व अनिकेत दुधभातेवर आंदेकर टोळीकडून हल्ला झाला. त्यात निखील आखाडेचा मृत्यू झाला. तेव्हापासून गायकवाड टोळी बदला घेईल, असा अंदाज होता. त्यानूसार, १ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री वनराज याचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून केला. आंदेकर टोळीच्या वर्मी हा घाव घातल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वासह पोलिस दलात होती. त्याचा बदला घेतला जाईल असेही भाकित होते. त्यातूनच मग, ५ सप्टेंबर २०२५ रोजी वनराज याच्या खूनातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, गुन्हेगारीतील दोन्ही खून नियमांच्या उलटे असल्याची चर्चा आता सुरू आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार वनराज याचा गुन्हेगारीशी संबंध नव्हता. तरीही त्याचा जीव घेतला. आयुष याचाही गुन्हेगारीशी संबंध नसताना त्याला टार्गेट करून ठार मारले गेले.

नात्यातील दोघांचा बळी

आंदेकर- गायकवाड टोळीत अत्यंत जवळच्या नात्यातील दोघांचा जीव घेतला गेला. बंडू आंदेकर यांना संजीवनी, कल्याणी व वृदांवनी या तीन मुली. पहिली संजीवनी हिचा जयंत कोमकर व दुसरी कल्याणी हिचा गणेश कोमकर याच्याशी विवाह झाला. आयुष हा गणेशचा मोठा मुलगा. म्हणजे, बंडू आंदेकरचा सख्खा नातूच आणि वनराज याचा भाच्चा देखील. पण, भावाच्याच खूनात सहभाग असल्याच्या आरोपावरून बंडू आंदेकर याच्या तक्रारीवरून संजीवनी, तिचा पती, व दिर गणेश यांना अटक झाली. बहिणीने भावाला मारण्यासाठी कट रचल्याने त्याला आर्थिक देखील किनार असल्याचे बोलले जाते. या सर्वात मात्र, बंडू आंदेकरला पहिला मुलगा आणि आता नातवाला गमवावे लागले आहे.

Web Title: Crime of andekar gaikwad gangs has increased in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • Murder Case
  • pune murder
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या
1

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

धक्कादायक ! बहिणीस पळवून नेण्यास मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या
2

धक्कादायक ! बहिणीस पळवून नेण्यास मदत केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

Mangesh Kalokhe Murder Case: मंगेश काळोखे प्रकरणात अनेक ‘लूप होल’! आमदार महेंद्र थोरवे यांचा संशय; सर्व शंकांच्या चौकशीची मागणी
3

Mangesh Kalokhe Murder Case: मंगेश काळोखे प्रकरणात अनेक ‘लूप होल’! आमदार महेंद्र थोरवे यांचा संशय; सर्व शंकांच्या चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.