
धक्कादायक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याने संपवल जीवन (Photo Credit- X)
मृत विद्यार्थ्याचे नाव नमन अग्रवाल असून, तो भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) पवई येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या (स्थापत्य अभियांत्रिकी) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. नमन मूळचा राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी होता.
A 21-year-old IIT Bombay student allegedly died by suicide after jumping from the terrace of the hostel, Mumbai Police said. The deceased has been identified as Naman Agarwal. Read more here:https://t.co/OFbJk1L5Em#iitbombay #SuicideCase #hostelterrace #MumbaiPolice pic.twitter.com/TIF6Lt5mlR — IndiaTV English (@indiatv) February 4, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, नमनने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून अचानक खाली उडी मारली. उंचावरून पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा आवाज होताच सुरक्षा रक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत नमनचा प्राण गेला होता. या दुर्घटनेने त्याचे वर्गमित्र आणि शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. नमन हा अभ्यासात अत्यंत हुशार विद्यार्थी असल्याचे त्याच्या ओळखीच्या लोकांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नमनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. नमनने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली असून त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपची तांत्रिक तपासणी केली जात आहे. पोलिसांनी नमनच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली आहे.
आयआयटी मुंबईतील या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न चर्चेत आला आहे. आयआयटी व्यवस्थापनाने या घटनेवर शोक व्यक्त केला असून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या समुपदेशन सेवांचा अधिक विस्तार करण्याबाबत विचार सुरू केला आहे. “तरुणांच्या मनातील द्वंद्व ओळखून त्यांना वेळीच मानसिक आधार देणे ही काळाची गरज आहे,” असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात