
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
मृत्यू झालेल्या महिलेचे नाव नीरज शर्मा असे आहे. या जयपूर न्यायालयात एलडीसी (लॉवर डिव्हिजन क्लर्क) पदावर कार्यरत होत्या. गेल्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले होते, त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना ही सरकारी नोकरी मिळाली होती. मात्र त्यांची मुलगी आयुषी हिची नजर त्या नौकरीवर आणि कुटुंबाच्या संपत्तीवर होती. तिला असे वाटले की वडिलांच्या निधनानंतर ही नौकरी तिला मिळेल, मात्र आई स्वतः कामावर रुजू झाल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते. अखेर आईला रस्त्यातून हटवून अनुकंपा नोकरी आणि संपत्ती दोन्ही हडपण्याच्या उद्देशाने आयुषीने आपल्या नातेवाईकांसह मिळून क्रूर हत्येचा कट आखला.
कशी केली हत्या?
या हत्येसाठी आयुषीने तिचा चुलता मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांच्याशी हातमिळवणी केली होती. या तिघांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा नावाच्या गुंडाला 7 लाख रुपयांची सुपारी दिली. नीरज शर्मा यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला एक थार गाडी भाड्याने घेतली आणि अनेक दिवस रेकी केली. तब्बल महिनाभर पाळत ठेवल्यानंतर, 3 जुलै रोजी जेव्हा नीरज शर्मा आपल्या मुलाला कोचिंग क्लासमधून सोडून घरी परतत होत्या, तेव्हा 130 किमी प्रतितास वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की नीरज यांचा मृतदेह 100 फूट दूर जाऊन पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भावाने दिली तक्रार आणि सगळंच बिंग फुटलं
नीरज शर्मा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ राकेश कुमार शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने सांगितले की त्यांची बहीण आधीपासूनच मुलगी आयुषी, सासरची मंडळी आणि दीराच्या मुलाकडून मालमत्तेसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत होती. तसेच तिला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. पोलिसांनी आयुषीची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी आयुषी शर्मा, मोहन स्वरूप, मोहित शर्मा, आकाश शर्मा, अरविंद शर्मा, हेमंत शर्मा आणि रोहित जाटव यांना अटक केली आहे, तर या कटात महत्त्वाचा दुवा असलेला चुलत भाऊ बलराम उर्फ रवी हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Ans: 7 लाख रुपये.
Ans: सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासामुळे.
Ans: सात आरोपींना.