
Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्याची पत्नी पार्वती भिल आणि एक मुलगा सनी इयत्ता दुसरीत तर दुसरा अंगणवाडीत असलेला राज यांना सोबत घेऊन पहाटे चारच्या सुमारास घरातुन बाहेर पडले होते. त्यानंतर काहीवेळातच अमळनेर मधील धावत्या रेल्वे समोर जाऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक समोर आला. यानंतर गुरुवारी पहाटे ४.४०च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.
Dog Crime: कुटुंबीयांच्या जुन्या वादातून 2 मुक्या जीवांचा बळी; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. सहाय्यक गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करुन पंचनामा करण्यात आला. या घटनेची बातमी परिसरात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये शोककळेचे वातावरण पसरले.
प्राथमिक माहितीनुसार, भिल कुटुंबातील सदस्य पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच रेल्वे प्रशासनाकडून अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, हे कुटुंब कोणत्या कारणामुळे घराबाहेर पडले आणि त्यानंतर नेमकी कोणती घटना घडली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
दरम्यान, प्राथमिक चर्चेत कौटुंबिक कारणाचा उल्लेख होत असला तरी त्या घटनेला पोलिसांकडून अद्याप पुष्टीकरण झालेले नाही. कुटुंबातील कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी किंवा अजून कोणते कारण होते का, यासह विविध शक्यतांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनेपूर्वी कुटुंबात कोणता वाद किंवा तणाव होता का, याचीही माहिती घेतली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.