
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणाची सुरुवात १९ एप्रिल 2025 रोजी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका अपघाताच्या नोंदीने झाली होती. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दहीवाड फाटा परिसरात एका काळ्या रंगाच्या थार गाडीने राजेंद्र जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती आणि या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेच्या आधारे मृताची पत्नी अरुणा जाधव यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांचा विमा दावा दाखल केला होता. यासाठी रीतसर एफआयआर आणि शवविच्छेदन अहवाल देखील सादर करण्यात आला होता.
संशय आला आणि…
विमा कंपनीला अरुणा जाधव हिने केलेल्या दाव्याबाबत संशय आला आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली. तेव्हा तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. ज्या राजेंद्र जाधव यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते, त्यांचा मृत्यू प्रत्यक्षात एक वर्षापूर्वीच आजारपणामुळे झाला होता. त्यांना विम्याची मोठी रक्कम पाहिजे होती म्हणून त्यांच्या मृत्यूला अपघाताचे रूप देण्यात आले.
या कटात कोण कोण सहभागी
या कटात मृत राजेंद्र यांचा भाऊ, विमा एजंट, एक खाजगी डॉक्टर आणि चार पोलीस कर्मचारी यांचा सहभाग आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी एकूण ९ जणांना अटक केली असून त्यांच्यावर फसवणुकीसह विविध कमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वीही अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून इतर कंपन्यांची फसवणूक केली आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणामुळे महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागातील भ्रष्ट साखळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
Ans: वर्षभरापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करून 50 लाखांचा विमा दावा करण्यात आला.
Ans: मृताची पत्नी, त्याचा भाऊ, विमा एजंट, एक डॉक्टर आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले.
Ans: या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या विमा फसवणूक रॅकेटचा तपास सुरू आहे.