
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या मुलीचे नाव कीर्ती असे आहे. ते आंध्र प्रदेश येथील गुंटूर जिल्ह्यातील अड्डागल्ला येथील मुलीची असून ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. ती मुंबईत नोकरी करत होती. तिचे साई सुमंत नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली होती. मागील आठ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध तुटले. ब्रेकअपच्या धक्क्यात असतानाच तिला बॉयफ्रेंड दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत असल्याचे कळले. यामुळे ती आणखीनच खचली. तिने याची माहिती आपल्या मुंबईतील तिच्या पीजी खोलीत १४ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
चिठ्ठीत काय?
आत्महत्या करणाऱ्या पूर्वी तिने एक चिठ्ठी लिहली होती. त्यात तिने लिहिले होते की, माझ्या पार्थिवावर बॉयफ्रेंड साई सुमंतच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्याचबरोबर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिला मंगळसूत्रही घालण्यात यावे. अशी इच्छा तिने व्यक्त केली होती.
दोन्ही कुटुंबामध्ये वाद
१६ जुलै रोजी कीर्तीचे पार्थिव मुंबईतील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यांनतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनतर कीर्तीचे कुटुंबीय पार्थिव घेऊन साई सुमंत याच्या पोंडूर गावात घेऊन गेले. तिथे दोन्ही कुटुंबात वाद झाला. कीर्तीच्या कुटुंबीयांनी साई सुमंतच्या घरासमोर धरणे आंदोलन केले आणि साई सुमंतने कीर्तीच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे अशी मागणी केली. त्यामुळे तणाव वाढला. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साई सुमंतचे कुटुंबीय घराला कुलूप लावून दुसरीकडे निघून गेले. त्यामुळे संतापलेल्या कीर्तीच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडून निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कीर्तीच्या पार्थिवावर त्याच गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं
Ans: कीर्ती
Ans: प्रियकराच्या गावात अंत्यसंस्कार आणि गळ्यात मंगळसूत्र घालण्याची
Ans: दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.