बाली दौरा केला रद्द
१८ जून रोजी केतनची लोहगडावरून ढकलून देत सिया आणि चेतनने हत्या केली. सुरुवातील वाटले होते की हा निव्वळ अपघात आहे. मात्र अपघात नसून पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास करत हत्येचा कट उघडकीस आणला. मिळालेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांच्या विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. लग्नाचे हॉल आणि इतर सर्व बुकिंग पूर्ण झाले होते. ६ जून रोजी सिया आणि केतन हे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी ‘बाली’ (इंडोनेशिया) येथे जाणार होते. विमानाची तिकिटे आणि हॉटेल बुकिंग सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, बाली दौऱ्यात केतनसोबत तिला राहायचे नव्हते यामुळे केतनचा पासपोर्ट चोरला आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर फूड मॉलच्या स्वच्छतागृहात (टॉयलेट) फेकून दिला. पासपोर्ट अचानक गहाळ झाल्यामुळे केतनला बाली दौरा रद्द करावाला लागला होता. या पहिल्यावेळेस तीने आखलेला डाव यशस्वी झाला होता.
Nasrapur Crime: महाराष्ट्र हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात आज शिक्षा; फाशी की जन्मठेप? निर्णयाकडे लक्ष
महाबळेश्वरला एकाच खोलीत राहावं लागलं असत
१९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस संस्मरणीय ठरवण्यासाठी केतनने महाबळेश्वर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये खास सेलिब्रेशन आणि मुक्कामाचे (नाईट स्टे) नियोजन केले होते. मात्र, या ट्रिपदरम्यान केतनसोबत एकाच रूममध्ये राहावे लागेल या विचाराने सिया प्रचंड अस्वस्थ झाली होती. केतनसोबतचा हा मुक्काम कोणत्याही परिस्थितीत टाळायचा, याच एका विकृत हट्टापायी तिने वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा गेम करण्याचा अंतिम कट प्रियकर चेतनच्या मदतीने अमलात आणला आणि त्याची हत्या केली. लोणावळा ग्रामीण पोलीस या संपूर्ण धक्कादायक कबुलीनंतर न्यायालयासमोर पक्के पुरावे सादर करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
पोलीस कोठडी संपणार
दरम्यान आज आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपणार आहे. पोलीस आज न्यायालयात दोनीही आरोपींना हजर करणार आहे. दरम्यान काल हत्येचा उलगडा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी काल लोहगडावर जाऊन संपूर्ण घटनेचे थरारक पद्धतीने ‘सीन रीक्रिएशन’ केलं. मुख्य आरोपी सिया गोयलला पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी नेण्यात आलं जिथून केतनला दरीत ढकलण्यात आलं होतं.






