जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर UPSTDC कडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज; मथुरा-वृंदावनसह ब्रजभूमीची सफर
मायणी ता. खटाव येथे सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने आयोजित पहिल्या सभेत ते बोलत होते. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले,मंत्री बावनकुळे यांनीच कुणबी नोंदी रद्द केल्या असून या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
जरांगे पाटील पुढे म्हणाले,बावनकुळे यांनी नोंदी रद्द केले नाहीत असे दाखविण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देऊन पत्र काढायला लावले. मात्र या नोंदी बावनकुळे यांनीच रद्द केले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही मंत्र्याच्या दबावाखाली किंवा राजकीय आदेशानुसार काम करताना आपण कोणाच्या हातचे बाहुले होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. चुकीचे निर्णय घेतल्यास त्याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागू शकतात असा इशारा त्यांनी दिला.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या ताकदीने मराठा समाज कधीच उठला नाही. आता पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज सावध झाला आहे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस आहे, बागायती जमीन आहे त्यामुळे त्यांना कशाची गरज नाही असा जो समज आहे तो समज दूर करून हा लागलेला डाग पश्चिम महाराष्ट्राने पुसून काढणे गरजेचे आहे. जाणून बुजून प्रमाणपत्र रद्द करण्याची ही भूमिका शासनास धोक्याची घंटा ठरू शकते.
यावेळी जि. प. सदस्या मनीषा फडतरे, जि. प . सदस्य सुरज पाटील, संदीप मांडवे, सरपंच सौ सोनाली माने,मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख,हिंमत देशमुख, रणजीत माने, स्वप्निल घाडगे ,हेमंत जाधव ,मराठा समाजाचे समन्वयक अरुण काकडे ,दीपक कणसे , कृष्णात सोमदे आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन सयाजी देशमुख यांनी केले.
Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी





