शिये फाटा टोप येथे गोळीबार सलग तीन फायरिंग घटनेमुळे परिसरात खळबळ
भाईंदर/ विजय काते :-मिरारोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरारोड परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. कालच नवी मुंबईतील सानपाड्यात गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता मिरारोडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.मिरा-भाईंदर मध्ये एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.
मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरच्या बी विंग भागात शम्स सब्रीद अन्सारी उर्फ सोनू (३५) हा साहित्य विकायचा. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून शम्स बाहेर उभे होते. त्यावेळी चेहऱ्यावर कापड गुंडाळलेल्या हल्लेखोराने शम्स यांच्या डोक्यात गोळी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाडसह नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमर जगदाळेसह अन्य अधिकारी व कर्मचारी, मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट १ चे निरीक्षक अविराज कुराडे, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शम्स हा एका गुन्ह्यात साक्षीदार होता. त्याला धमक्या दिल्या जात होत्या व तशी तक्रार त्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेमागे युसूफ नावाच्या इसमाचे नाव येत आहे. पोलिस संशयित युसूफचा शोध घेत आहेत. अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीसांना तपास सुरु आहे.
युसूफ हा शम्सला सतत धमक्या देत असल्याची माहिती समोर आली आहे. युसूफचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.सध्या नयानगर पोलीस आणि मीरा-भाईंदर गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. तसेच हल्लेखोराने वापरलेल्या मार्गांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी शम्सच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली असून, हल्ल्याशी संबंधित पुरावे शोधण्यासाठी स्थानिकांना देखील चौकशीसाठी बोलावले आहे.या घटनेमुळे मिरारोड परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी या घटनेतील दोषींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.याआधी, २ जानेवारीला नवी मुंबईतील सानपाडा येथे देखील गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांत मिरारोडमध्ये अशी घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सतत होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये असे सांगितले असून, कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या हत्याकांडातील दोषींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; चार जणांचा मृत्यू
राज्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत जात असून ही दिवसेंदिवस अत्यंत चिंतेची बाब होत आहे. बदलापुर आणि कल्याणमधील अल्पवयीन मुलींवर झालेले अत्याचार प्रकरण, बीडमधील हत्या प्रकरण या आणि अशा दिवसेंदिवस घडत जाणाऱ्या गुन्ह्यांमुळे महाराष्ट्र राज्यातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगाकांवर कायद्याचा धाक राहिला नसून सर्वसामान्य नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.