
crime (फोटो सौजन्य: social media)
‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
काय घडलं नेमकं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी उत्तर नागपूरच्या नारी भागात पी एम आवास योजनेचा कार्यक्रम पार पडला. व्हिआयपी मुव्हमेंट असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त होता. मात्र काहीच काळानंतर तिथे चाकू हल्ल्याची भीषण घटना घडली. एका चहा विक्रेत्याने एका व्यक्तीची केवळ दहा रुपयांच्या चहाच्या वादावरून चाकूने वार करून हत्या केली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नाव मनोज विश्वनाथ यादव ( वय ४५) असे आहे. त्याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. तर या प्रकरणातील आरोपीचं नाव कैलास लालचंद्र गणवीर( वय ४२) असे आहे. त्याने दुधाची प्लास्टिक पिशवी उघडण्यासाठी ठेवलेल्या चाकूने त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दहाच रुपये न दिल्याने वाद आणि…
मनोज यादव याने चहाचे थकित दहा रुपये चहा विक्रेता कैलासला न दिल्याने दोंघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी मनोजने कैलासला झापड मारली. त्यावर कैलासने मनोजच्या मानेवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याला तातडीने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मनोजचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कैलास याला घटनास्थळावरून अटक केली आहे. घडलेली घटना कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली.
Ans: 10 रुपयांच्या चहाच्या पैशांच्या वादावरून.
Ans: मनोज विश्वनाथ यादव.
Ans: आरोपी कैलास गणवीर याला घटनास्थळावरून अटक केली.