
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून अथर्व बेपत्ता झाला होता. त्यांनतर त्याचा मृतदेह भरतवाडा पुलावर पोत्यात बांधलेला आढळ्याला. यामुळे आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांनी तपासाचे चक्रे गतिमान केला आणि आरोपीला अटक केली. आरोपी हे अर्थवचे शेजारी आहे. जय यादव आणि त्याचे मित्र कृणाल शाहू आणि आशिष शाहू यांनीच अपहरण करून हत्या केली. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.
कशी केली हत्या?
हनुमान जयंतीच्या रॅलीमधून गाडी आणायला जायचं आहे, असे कारण देत आरोपींनी अथर्वला सोबत घेऊन गेले. अपहरण केल्यानंतर काही तासात अर्थवची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी अथर्वचा मृतदेह गाडीतच ठेवला होता. तर शनिवारी लोणार भागात अथर्वचा मृतदेह सापडला होता.
हत्या करण्याचं कारण काय?
अर्थवची हत्या पैश्यांसाठी केल्याचे समोर आले आहे. त्याचा अपहरण करून खंडणी मागण्याचा आरोपींचा कट होता. मात्र हत्येनंतर भीतीमुळे खंडणीसाठी आरोपींनी दोन केला नसल्याने हत्येचा उलघडा होत नव्हता. अखेर तीन दिवसानंतर या हत्येचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.
Ans: हनुमान जयंती रॅलीतून आरोपींनी त्याला सोबत नेले.
Ans: पैशासाठी अपहरण करून त्याची हत्या केली.
Ans: क्राईम ब्रांचने तिघा आरोपींना ताब्यात घेतले.