
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पिंकी (३१) असे आहे. सुमारे ११ वर्षांपूर्वी पिंकीचा आशिष झा याच्याशी लग्न झाला होता. लग्नानंतर काही काळातच पती तसेच सासू-सासरे यांनी हुंड्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. तिच्या चारित्र्यावरही वारंवार संशय घेतला जात होता. आशिषचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्यावरूनही पिंकीसोबत नेहमी त्याचा वाद होत होता. संशयावरून घरात सतत वाद आणि मारहाण होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याच सततच्या कौटुंबिक कलह आणि छळाला कंटाळून पिंकीने १४ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र मृत पिंकीचा भाऊ राजीवकुमार मोहन पाठक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये आशीष झा (३५), गयानाथ झा (६५) आणि इंद्रासन झा (६०, तिघेही श्यामनगर, पारडी) यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री आशीष झा याला अटक करण्यात आली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
‘सोबत जगू शकलो नाही तर सोबत मरू…’; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय
नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला दोन्ही कुटुंबीयांनी विरोध केल्याने निराश झालेल्या प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उपचारादरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांचे चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते. त्यांना लग्न करायचे होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिल्याने त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला समोर आले आहे. घडलेली घटना नागपूरच्या वानाडोंग्री परिसरात घडली.
Ans: नागपूरच्या पारडी परिसरात.
Ans: चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ आणि मानसिक-शारीरिक अत्याचार.
Ans: पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पतीला अटक केली.