(फोटो सौजन्य: Pinterest)
सदर घटना ही चंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विशुनपुर गावात घडली आहे. मृतकांची ओळख विशुनपुरचे रहिवाशी दिलचंद्र तांती (60) आणि सुन गौरी देवी (30) अशी पटली आहे. प्राथमिक तपासात दिलचंद्रचे आपल्या सुनेसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. पती पुरुशोत्तम कुमार याला जेव्हा या अफेअरविषयी समजले तेव्हा त्याचे वडिलांसोबत एक कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागात पुरुषोत्तमने पत्नीला गाैरीला विष खाऊ घातले आणि मग स्वत:ही विषाचे सेवन केले.
वडिलांनी घेतली गळफास
सुनेने आणि मुलाने विषाचे सेवन केले आहे हे समजताच वडिल दिलचंद्र यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. गळफास घेत त्यांनी स्वत:चे आयुष्य संपवले. दिलचंद्रचा दुसरा मुलगा रंजीत कुमार देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.
कुटुंबातील अन्य सदस्य होते बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. यावेळी घरातील अन्य सदस्य शेतात काम करत होते. घरातील लहान मुलांनी धावत-पळत जाऊन इतर कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली ज्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. याकाळात स्थानिक लोकांनी मदत करत चोरांना चंडीतील रुग्णालयात दाखल केले. इथे डाॅक्टरांना सासरे आणि सुनेला मृत घोषित केले तर दोन्ही भावांची परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट केले.
Satara News : पैशाच्या व्यवहारातून पेरले येथे गोळीबार; दोन्ही पायांना गोळ्या लागल्याने एकजण गंभीर
पोलिसांचा तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनेस्थळी दाखल झाली आणि त्यांनी दोघांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर घटनेचा पुढील तपास केला जाईल. पोलिस सध्या सर्व बाजूंचा तपास करत असून लवकरत यावर योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल.






