
crime (फोटो सौजन्य: social media)
मागील वर्षी एप्रिल महिन्यात गुरुनाथ चिचकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. गुरुनाथ चिचकर यांचा मुलगा नवीन चीचकर याला अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात अमली पदार्थ गुन्हे कक्षाने ताब्यात घेतले होते. एनसीबी मुंबईचे अधिकारी आकाश मलिक व त्यांचं 15 ते 20 जणांचे पथक गुरुनाथ चीचकर यांच्या घरी आले होते. चिचकर यांनी त्यांना प्रश्न विचारले असता, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही असं म्हणत त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले व त्यांच्या घराची झडती घेत कार्यालयातील काही मूळ फाईल्स, बँक स्टेटमेंट व २ लाख रुपये रोख रक्कम, किमती घड्याळ जप्त केले व पंचनामाची प्रत न देता त्यावर जबरदस्तीने सह्या घेऊन निघून गेले.
Buldhana Accident: मेहकरजवळ भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; 2 ठार, 23 जखमी
तसेच मुंबई एमसीबी कार्यालयात भेटण्यासाठी बोलवले असता दोघेही मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांना भेट दिली असता, त्यांनी सदरच्या प्रकरणातून मुलांची नावे वगळण्यासाठी 10 ते 15 कोटी रुपयांची मागणी केली असल्याच डॉक्टर किरण चीचकर यांनी तक्रारीत म्हटल आहे. तसेच एनसीबी नवी मुंबईचे अधिकारी संदीप निगडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. निगडे यांनी गुरुनाथ चिचकर यांना पोलीस ठाण्यात बोलवून पैशांची मागणी केली. तसेच तुम्ही मुलांना हजर करा, नाहीतर पैसे आणून द्या. तुम्ही पैसे नाही दिले तर तुमच्या व तुमच्या पत्नीला जेलमध्ये टाकावे लागेल, अशी धमकी देत संदीप निगडे यांनी पैशाची मागणी केली असल्याचे किरण चिचकर यांनी तक्रारीत म्हटल आहे.
उच्च न्यायालयाचे आदेशानुसार डॉक्टर किरणचकर यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात एनसीबी अधिकाऱ्यांच्या सततच्या मानसिक त्रास, पैशांची मागणी, व खोट्या गुन्ह्यांची धमकी या त्रासामुळे गुरुनाथ चिचकर यांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. त्यातच या प्रकरणात अधिकाऱ्यांवर पैसे मागितल्याचे आरोप झाल्याने या प्रकरणातील तपासकडे व त्याच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
चौकट…
नवीन चिचकर प्रकरणात नवी मुंबईतील सचिन भालेराव व संजय फुलकर या दोघांचा सहभाग आढळून आल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दोघांचेही निलंबन केलं होतं. मात्र गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्या प्रकरणात डॉक्टर किरण चिचकर यांनी नवी मुंबई अमली पदार्थ कक्षाचे वरिष्ठ अधिकारी संदीप निगडे यांचं नावं तक्रारीत नमूद केल्याने या अधिकाऱ्यावर आयुक्त भारंबे कश्याप्रकारे कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा पूल येथील घटना
Ans: एनसीबी अधिकाऱ्यांच्या मानसिक छळ, खंडणी मागणी व धमक्यांमुळे आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
Ans: त्यांची पत्नी डॉ. किरण चिचकर यांनी तक्रार दाखल केली.
Ans: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.