काय नेमकं प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा आरोप केला. त्यांनतर विध्यार्थ्यांना वारंवार मानसिक दबावाखाली ठेवत त्यांच्या आईकडे पैश्यांची मागणी केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर “पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही,” अशी धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या सततच्या दबावामुळे आणि भीतीमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला.
Mumbai Crime: दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक
या मानसिक तणावातून दोन विध्यार्थ्यानी अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शाळा प्रशासनाचीही सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत
तळोजा घोट कॅम्प परिसरात नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दोन पंजाबी आरोपीना ताब्यात घेतले आहे. या दोनही आरोपींकडून तब्बल 1 कोटी 2 लाख 9 हजार 500 रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केल आहे. नवी मुंबई अमली पदार्थ पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Buldhana Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत
Ans: नवी मुंबईतील घणसोली परिसरात ही घटना घडली.
Ans: कथित मानसिक छळ आणि दबावामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.
Ans: एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत.






