
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
खारघर येथील पांडवकडा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो. मात्र, हा धबधबा जितका सुंदर आहे तितकाच धोकादायकही आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि धोकादायक बनतो. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. तरीही अनेकजण या आदेशाकडे दुर्लक्ष करून धबधब्यावर जात असल्याने वारंवार दुर्घटना घडत आहेत. अशाच प्रकारे बंदी झुगारून पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनांत हे दोन तरुण वाहून गेले आहेत. तरूण वाहून गेल्यानंतर त्याची माहिती स्थानिक पोलिस आणि अग्नशमन दलाला देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल दोन कोटी 64 लाखांचे अमली पदार्थ केले नष्ट
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली. मात्र, मुसळधार पावसामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान झाला असून, बचावकार्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे दोन्ही तरुणांचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू असून, हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
बेपत्ता झालेले तरुण कोण?
तळोजा फेज 1 सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद हा राहत होता. त्याचे वय वीस वर्षे होते. हा तरूण पांडवकडा परिसरात पाण्याच्या प्रवाहात बुडाला आहे. तर दुसरा तरुणा हा मुंबईतल्या सांताक्रुझचा आहे. त्याचे वय 19 वर्ष आहे. शेण्णोन गॅस्पर किनी असं या तरुणाचं नाव आहे. तो ही धबधब्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास बंदी आहे. प्रशासनाने आता कडक इशारा दिला आहे. शिवाय धबधब्याकडे जाण्याचा मार्ग ही बंद करण्यात आला आहे. कुणीही धबधब्यावर जावू नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
Ans: पांडवकडा धबधब्यावर बंदी असतानाही गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून नेल्याची घटना घडली.
Ans: मुसळधार पाऊस आणि धबधब्यातील वेगवान पाण्याचा प्रवाह यामुळे शोधमोहीम राबवताना अडचणी येत आहेत.
Ans: अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी शोधमोहीम राबवत असून नागरिकांना धबधब्याकडे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.