
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव बिरेंद्र बेहरा असे आहे. तो बालासोर जिल्ह्यातील जमूना जावचा रहिवासी होता. बिरेंद्र 31 मे रोजी त्याचा मित्र बिरेन मढेई याच्यासोबत डंपर चालक म्हणून काम करण्यासाठी शेजारील मयूरभंज जिल्ह्यात गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबाने त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण काहीही पत्ता न लागल्याने पत्नी सावित्री बेहरा हिने पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी बिरेंद्रच्या संपर्कातील लोकांकडे चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
जुनी मैत्री मात्र…
बिरेंद्र बेहरा आणि बिरेन मढेई हे दोघे जुने व चांगले मित्र होते आणि दोघेही अनेकदा राज्याबाहेर जाऊन काम करायचे. परंतु, बिरेंद्रचे बिरेनच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आले. हा वाद इतका वाढला की, तो मिटवण्यासाठी गावातील समितीसमोर (पंचायत) बैठकही झाली होती. गावकऱ्यांनी आणि सरपंचांनी हस्तक्षेप करून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये 50 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला होता. मात्र, या तडजोडीनंतरही बिरेनच्या मनातील राग कमी झाला नाही.
आरोपीला मुंबईतून अटक
बिरेनने बिरेंद्रला बोलावून घेऊन 25 मे रोजी त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह जंगलात गाडून टाकला आणि तो मुंबईला पळून गेला. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि संशयाच्या आधारे बिरेनला शोधून काढले आणि मुंबईत त्याला अटक केली. बिरेनला ओडिशात आणण्यात आले. त्याची कडक चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सांगितलेल्या परिसरातून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.
इंद्रायणी नदीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; पीएमआरडीएच्या पथकाने वाचवले प्राण
Ans: बिरेंद्र बेहरा असे मृत व्यक्तीचे नाव होते.
Ans: आरोपीने मृतदेह जंगलात पुरून मुंबईला पळ काढला.
Ans: पोलिसांनी आरोपीला मुंबई येथून अटक केली.