
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
अहिला जाधव या विवाहित महिलेच्या पतीचे नाव राजू जाधव असे आहे. रविवारी त्यांच्या दोघांचे भांडण झाले. या भांडणानंतर अहिला आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत घराबाहेर पडली. ती घरी न परतल्यानं पतीने शोधाशोध करण्यास सुरुवात केली. शोध सुरु असताना गौरी जाधव या अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह थोरस्थळ येथील एका विहिरीमध्ये तरंगताना आढळून आला. दरम्यान त्याच विहिरीत अहिला जाधव आणि मुलगा सार्थक जाधव याचाही मृतदेह सापडला.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहे.
कारण काय?
राजू जाधव हा नेहमी अहिलावर चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करत होता. या गोष्टीला कंटाळून संबंधित महिलेने दोन मुलांसह जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
‘टीडब्ल्यूजे’ कंपनीचा मालक समीर नार्वेकर पत्नीसह अटकेत; अनेकांना कोट्यवधींचा चुना
महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते राज्यातील बडे राजकारणी, मंत्री-आमदार तसेच प्रशासनातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या टिडब्लूजे कंपनीच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
टिडब्लूजे कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत पालम या तिघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या या आर्थिक फसवणूक प्रकरणात टिडब्लूजे कंपनीने विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले होते.
Ans: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ गावात ही घटना घडली.
Ans: अहिला जाधव (30), सार्थक जाधव (5) आणि गौरी जाधव (4 महिने).
Ans: पतीकडून सतत चारित्र्यावर संशय व कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला जात आ