
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय घडलं?
हत्या झालेल्या महिलेचे नाव रुतुजा अक्षय तावरे असे आहे. तर आरोपी पतीचं नाव अक्षय रामदास तावरे असे आहे. ऋतुजा आणि अक्षय यांचा विवाह १६ मे २०२६ रोजी झाला होता. परंतु लग्नाच्या सहा महिन्यानंतरच त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. हळू हळू तो वाद विकोपाला गेला आणि अक्षयकडून रुतुजाला मारहाण सुरु झाली. या मारहाणीचा कंटाळून सहा महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी पणदरे येथे रुतूजा निघून गेली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी बारामती महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. जिथे दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत तडजोड होऊन ती पुन्हा आपल्या पतीसोबत राहायला गेली होती. मात्र पुन्हा काही दिवसांनी दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. एप्रिल २०२६ मध्ये ती पुन्हा माहेरी आली होती. ४ मे २०२६ रोजी भावाने तिला सासवड येथे सोडले तेव्हा आरोपी अक्षयने तिला आर्वीला नेले. तिथे तिची आढणीने गळा आवळत हत्या केली.
‘या’ कारणावरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव; पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा
मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास रुतुजाचे मामा बजरंग काशिद यांना तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. याची माहिती राजगड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुतुजाला तातडीने श्लोक हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याची माहिती पोलिसांनी रुतुजाच्या कुटुंबियांना दिली. रुतुजाच्या भावाने, अनिकेत पवार यांनी खेड-शिवापूर पोलीस चौकीत जाऊन अक्षय तावरे याच्या विरोधात लेखी तक्रार दिली.
आरोपी फरार
राजगड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 आणि 85 अन्वये आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अक्षय तावरे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ऋतुजाच्या मृत्यूने तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आअसून परिसरात संताप व्यक्त केलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच आरोपीला जेरबंद केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Ans: रुतुजा अक्षय तावरे असे मृत महिलेचे नाव आहे.
Ans: पती अक्षय तावरे याने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.
Ans: राजगड पोलिसांनी पतीविरोधात BNS कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.