
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
आरोपी प्रकाश अर्जुन तिखात्री, मृत महिला मनीषा दमाई आणि तक्रारदार किशन परिहार हे मूळचे नेपाळचे असून पुण्यात रखवालदार म्हणून काम करत होते. मनीषा ही किशनची बहीण आहे. प्रकाश आणि मनीषा दोघेही विवाहित असून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. प्रकाशला हे संबंध संपायचे होते. पण मनीषा त्याला सोडण्यास तयार नव्हती. यामुळे दोघांमध्ये वाद होत होते. याच वादातून १८ मार्च रोजी प्रकाशने मनीषाला भिलारवाडीच्या जंगलात नेऊन दोरीने गळा आवळून हत्या केली.
Nashik Breaking News: भोंदुबाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
ही घटना मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या वाडा हॉटेलच्या मागील बाजूच्या जंगल परिसरात घडली. मनीषा बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दिली. तपासात प्रकाशचे नाव पुढे आल्यांनतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, घटनास्थळही दाखवले. किशन परिहार यांनी मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.
हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार
पुण्यातील लोहगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पिस्तुलाचा धाक देखील दाखवला, अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुळशीतील संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे आणि पत्नी सुवर्णा लोखंडेविरोधात लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील पीडित विवाहित महिला लग्नात माहेरच्या मंडळींनी सुमारे २ कोटी रुपये खर्च केले होते. यामध्ये दोन किलो चांदी आणि एक आलिशान चारचाकी गाडी देखील देण्यात आली होती. मात्र सासरच्या मंडळींना याचे समाधान झाले नाही. लोखंडे कुटुंबाला शेअर मार्केटमध्ये सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी सुनेकडे माहेरून पैसे आण्यासाठी तगादा लावला.
Nagpur News: कामठीत शेजाऱ्यांतील वाद विकोपाला; 47 वर्षीय महिलेचा हृदयविकाराने मृत्यू
Ans: पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ जंगल परिसरात.
Ans: अनैतिक संबंध संपवण्यावरून झालेला वाद.
Ans: आरोपीला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली घेतली.