
crime(फोटो सौजन्य-social media)
नेमकं प्रकरण काय?
अलिबाग तालुक्यातील घेरा सागरगड वडवली येथे 2004 साली ही घटना घडली होती. मनोज याची बकरी गणेश ठाकूर यांच्या आवारात मृत अवस्थेत आढळून आली होती. या घटनेबाबत प्रसाद ठाकूर यानेच बकरी मारल्याचा संशय मनोजला आला होता. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादातून मनोज ने अलिबाग न्यायालयात प्रसाद ठाकूर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणामुळे त्यांच्यातील वाद अधिकच वाढत गेला.
2 एप्रिल 2004 रोजी रात्रीच्या सुमारास मनोज याने प्रसाद ठाकूर याला एकटे गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात प्रसाद ठाकूर यांचा मृत्यू झाला या प्रकरणी गणेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून कोयनाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी जयप्रकाश उर्फ जयेश मात्रे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
२१ वर्ष होता फरार
मनोज हा गेली 21 वर्ष पोलिसांना चकवा देत फरार होता. मात्र पोयनाळ पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या आधारे त्याचा माप काढत पनवेल येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक केली. चौकशी दरम्यान त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अटकेनंतर मनोजला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून अधिक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि…पतीनेच केली आपल्या पत्नीची हत्या; कारण काय?
रायगड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सहा महिन्यापूर्वी सख्या मामाच्या पोरीशी आरोपीने लग्न केलं होत.या प्रकरणातील आरोपीचे नाव सतीश चव्हाण असे आहे. तर मृत्यु झालेल्या विवाहितेचे नाव निकिता राठोड (वय अंदाजे २२) असे नाव आहे. निकिता ही सतीशच्या सख्ख्या मामाची मुलगी आहे. विवाहानंतर दोघेही कर्नाटकातील गुरबर्गा येथून रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आले होते. येथे चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. सुरुवातीला दोघांचे संसारिक आयुष्य सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांतच सतीशने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून सतत दोघांमध्ये वाद होत होते.
Ans: ही घटना 2 एप्रिल 2004 रोजी घडली होती.
Ans: पोयनाड पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त तपासाच्या आधारे पनवेलमधून अटक केली.
Ans: बकरी मारल्याच्या संशयातून झालेल्या वादातून हा खून झाला होता.