Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडून लोकप्रतिनिधी निवडून आले असले तरी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास निधीचे नियोजन आणि वाटप कोणत्या पद्धतीने होणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2026 | 02:25 PM
Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्या अद्याप प्रलंबित असल्याने विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन लोकप्रतिनिधी निवडून आले असतानाही समितीची रचना पूर्ण झालेली नाही.
  • समिती कार्यान्वित झाल्यास स्थानिक गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार विकास निधीचे अधिक विकेंद्रित नियोजन होण्याची अपेक्षा आहे
अलिबाग: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन त्यातून स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी निवडून आले असतानाही रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने जिल्ह्यातील विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांना दिशा मिळणे अपेक्षित असताना समितीतील सदस्य नियुक्त्यांचा विषय प्रलंबित राहिल्याने निधी वाटपाची प्रक्रिया अद्याप आमदारांच्या माध्यमातूनच असल्याची चर्चा सुरू आहे.

Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीला महत्त्वाची भूमिका आहे. स्थानिक गरजा, प्राधान्यक्रम आणि उपलब्ध निधी यांचा समन्वय साधून विकासकामांचे नियोजन करण्याची जबाबदारी या समितीवर असते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतरही समितीच्या सदस्य नियुक्त्या प्रत्यक्षात न झाल्याने या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही.  (फोटो सौजन्य – AI Created) 

जिल्हा समितीच्या नियुक्त्या कधी होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरही जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्या रखडल्याने आता या नियुक्त्या नेमक्या कधी होणार, याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. समितीची रचना पूर्ण करून नियमित बैठका सुरू झाल्यास जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनाला अधिक व्यापक लोकप्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, निधी वाटपात आमदारांची भूमिका कायम राहणार की जिल्हा नियोजन समितीची यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर निधी नियोजनाची प्रक्रिया अधिक विकेंद्रित होणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होणार?

रायगड जिल्ह्यात भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार विकासाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. किनारी भागातील पाणी, रस्ते व पर्यटनविषयक सुविधा, औद्योगिक पट्टयातील पायाभूत सुविधा, ग्रामीण भागातील आरोग्य व शिक्षण व्यवस्था, तसेच दुर्गम भागातील रस्ते आणि पाणीपुरवठा अशा विविध प्रश्नांसाठी नियोजनबद्ध निधीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीची रचना वेळेत होऊन स्थानिक लोकप्रतिनिधींना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधी निवडले, समितीची रचना अपूर्ण

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या लोकग्रतिनिधींची निवड झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून स्थानिक समस्या आणि विकासाच्या गरजा जिल्हा नियोजनाच्या प्रक्रियेत मांडल्या जाण्याची अपेक्षा आहे. मात्र जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्या अद्याप लागू न झाल्याने स्थानिक पातळीवरील प्रतिनिधित्वाचा हा महत्त्वाचा दुवा प्रभावीपणे कार्यरत झालेला नसल्याचे चित्र आहे. यामुळे गाव, शहर आणि तालुकास्तरावरील विकासकामांना निधी देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या सामूहिक चर्चेला आणि प्राधान्यक्रमाला कितपत स्थान मिळत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

kolhapur : जळालं होतं, पण स्वप्न जळलं नाही ! केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिले

आमदारांमार्फतच निधीचे वाटप ? चर्चाना आले उधाण

विविध विकासकामांसाठी निधीचे वाटप आमदारांच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे. आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, सार्वजनिक सुविधा, शासकीय इमारती तसेच अन्य विकासकामांसाठी निधीची मागणी आणि शिफारस केली जाते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि जिल्हा नियोजन समिती यांच्यामार्फत व्यापक जिल्हास्तरीय नियोजन झाले, तर निधीचे वाटप अधिक समतोल आणि गरजेनुसार करता येऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Raigad district planning committee appointments delayed development fund planning under question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर
1

ChatGPT Advice : ChatGPT च्या एका सजेशनने कमवून दिले तब्बल 1.2 लाख कोटी रुपये, नक्की काय घडलं? पाहा सविस्तर

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!
2

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

Chandrapur News: चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; तीन जिल्ह्यांची जबाबदारी फक्त ४ कर्मचाऱ्यांवर
3

Chandrapur News: चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; तीन जिल्ह्यांची जबाबदारी फक्त ४ कर्मचाऱ्यांवर

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
4

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.