
न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवली हाडे
बेपत्ताची तक्रार ते अधिकचा उलगडा
संशयित परिसरात पुन्हा केली कसून शोधमोहीम
रत्नागिरी: जिल्ह्यातील (Ratnagiri) बहुचर्चित वाटद-खंडाळा खूनप्रकरणाच्या तपासाला अखेर निर्णायक कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा घाट परिसरात सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान काही मानवी हाडे (Crime) आढळून आली असून, ही हाडे बेपत्ता असलेल्या राकेश अशोक जंगम याचीच असावीत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हाडे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याबाबतची अधिकृत पुष्टी होणार आहे. ही हाडे राकेश जंगम याचीच असल्याचे निष्पन्न झाल्यास या गुंतागुंतीच्या प्रकरणातील तपासात पोलिसांना मोठे यश मिळणार आहे. खून प्रकरणाच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले होते.
सतावणाऱ्या भीतीमधून काढला राकेशचा काटा
प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील जाने चौकशीत सीताराम लक्ष्मण वीर (व्य ५५, रा. कळझोंडी) आणि राकेश अशोक जंगम (वय २८, रा. वाटद-खंडाळा) या दोघांचाही खून केल्याची कबुली दिली होती. दुर्वासच्या म्हणण्यानुसार, सीताराम वीर हे न्याची प्रेयसी भक्ती मयेकर हिच्याशी नोबाईलवरून अश्लील संभाषण करत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.
२९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम वीर हे दुर्वासच्या सायली बारमध्ये दारू पिण्यासाठी आले असता, दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि राकेश जंगम या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सीताराम यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी राकेश जंगम याला दारूचे व्यसन असल्याने तो खुनाची वाच्यता करेल, अशी भीती दुर्वांस पाटील याच्या मनात निर्माण झाली.
संशयित परिसरात पुन्हा केली कसून शोधमोहीम
मात्र, त्या तक्रारीनंतरही राकेशचा कोणताही ठोस सुगाव पोलिसांना लागला नव्हता. परिणामी, सीताराम वीर। राकेश जंगम या दोघांच्या खूनप्रकरणांचा उलगडा तब्ब वर्षभर रखडलेला होता, भक्ती मयेकर हिचा मृतदेह उर आंबा घाट परिसरात टाकण्यात आला होता, त्याच ठिकाण वर्षभरापूर्वी राकाश जंगमचा मृतदेह फेकून देण्यात आल्या माहिती तपासात पुढे आली आहे. भक्तीचा मृतदे पोलिसांना सापडला होता.
Shivraj Singh Chouhan यांना ISI कडून धमकी; गृह मंत्रालयाकडून Z+ सुरक्षेत वाढ
मात्र राकेशचा ठावठिकाण लागलेला नव्हता. अखेर पोलिसांनी त्या परिसरात पुन्ह कसून शोधमोहीम राबवली असता काही मानवी हा आढळून आली. ही हाडे नेमकी कोणाची आहेत, याबाचन सध्या पोलिसाकडून सखोल तपास सुरू असून न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच रहस्यांवर शिक्कामोर्तब होणार आहे. या अहवालाक संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, तो अहवाल य बहुचर्चित खूनप्रकरणाच्या अंतिम उलगडबा कारणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.