सलमान खानची मागितली माफी
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आला होता. ज्यामध्ये बिश्नोई गँगच्या एका सदस्याने लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवण्यासाठी सलमानकडे 5 कोटी रुपये मागितले होते. या व्यक्तीने सदर दिलेली धमकी हलक्यात घेतली तर सलमानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, असे म्हटले होते. आता त्याच व्हॉट्सॲप नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांचा आणखी एक मेसेज आला आहे, ज्यामध्ये याच व्यक्तीने माफी मागितली आहे.
मुंबई पोलिसांना आता आलेल्या या मेसेजबाबत खुलासा झाला आहे आणि त्यानुसार त्यांनी शोधायला सुरूवात केली आहे. तर या व्यक्तीचे सध्याचे नक्की राहण्याचे ठिकाणी कुठे आहे याचाही पोलिसांनी खुलासा केलाय असे ANI वरून सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
झारखंडमध्ये सापडला धागा
मुंबई वाहतूक पोलिसांना आणखी एक संदेश मिळाला आहे. हा मेसेज त्याच व्हॉट्सॲप नंबरचा आहे ज्याने यापूर्वी सलमान खानला धमकीचा मेसेज लिहिला होता. या मेसेजिंग नंबरवरून आलेल्या नव्या मेसेजमध्ये माफी मागण्यात आली आहे. सध्या पोलीस लोकेशन ट्रेस करत आहेत. हा संदेश झारखंडमधून आला आहे. मात्र, उर्वरित तपासाची प्रक्रिया सुरू आहे असे सांगण्यात आले आहे.
ANI ने केलेले ट्वीट
Mumbai Traffic Police received another message from the same WhatsApp number a few days later in which the person who threatened apologized, the message sender said that this message was sent by mistake and he apologised for it. The police have found the location of the person… https://t.co/0OX5keQQrH
— ANI (@ANI) October 21, 2024
18 ऑक्टोबरला दिली होती धमकी
खरे तर मुंबई ट्रॅफिक पोलिसांना याच नंबरवरून 18 ऑक्टोबरला मेसेज आला होता, त्यावेळी त्यांनी हे शत्रुत्व संपवण्याचा दावा केला होता, त्या मेसेजमध्ये असे लिहिले होते की, जर हा मेसेज दुर्लक्षित केला गेला तर सलमान खानची अवस्था होईल त्याचा जवळचा मित्र बाबा सिद्दीकी यापेक्षा वाईट करण्यात येईल. मात्र आता त्याच नंबरवरून पुन्हा मेसेज पाठविण्यात आला असून त्याने हा मेसेज चुकून पाठवला होता आणि आता त्याबद्दल माफी मागितली असे लिहिण्यात आले आहे.
तपास सुरू
या मेसेजनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या हा मेसेज ज्या ठिकाणाहून आला आहे ते झारखंडचे आहे असे सांगण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर पहिला मेसेज करण्यात आला होता. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा आणखी वाढविण्यात आली. ‘बिग बॉस 18’ च्या ‘वीकेंड का वार’चे शूटिंगही सलमान खानने 60 सुरक्षा दलांच्या उपस्थितीत केले होते. दरम्यान यावेळी सलमानला आपल्याला यायची इच्छा नसल्याचेही त्याने सांगितले होते.