
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
अक्षय रमेश जाधव (भिगवण, त. इंदापूर) हा आपल्या मित्रांसह महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आला होता. रात्रीच्या वेळी मित्रांसोबत मद्यपान झाल्यानंतर अक्षयची प्रकृती बिघडू लागल्याने मित्रांनी त्याला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली आणि ते वरच्या मजल्यावर गेले. काही वेळाने अक्षय खोलीबाहेर कसा आला, याबाबत नेमकी माहिती नसली तरी तो जवळच असलेल्या एका घराजवळ गेला. त्या घरात डोकावून पाहिल्याचा राग घरातील व्यक्तींनी मनात धरला. सूर्यकांत चंद्रकांत गोळे, अविनाश सतीश भोसले, राहुल जनार्दन राजपुरे आणि अमोल गेणदेव वाडकर या चौघांनी अक्षयला अडवले, नंतर त्याला हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली.
Pimpri-Chinchwad News: आकुर्डीत रिक्षात गळफास घेऊन रिक्षाचालकाची आत्महत्या; कारण अद्याप गूढ
या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला. मित्रांनी त्याला तातडीने पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील डॉ. बोके रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले.
चारही आरोपी अटकेत
या घटनेनंतर मृताचा मित्र विशाल अजित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचगणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) आणि 2(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत चारही आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे सात तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने चारही आरोपींना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Ans: सातारा जिल्ह्यातील पाचगणी परिसरातील भोसे गावात ही घटना घडली.
Ans: घरात डोकावून पाहिल्याचा संशय आल्याने चौघांनी त्याच्यावर बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
Ans: पाचगणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चारही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.