'आज तुझा गेम करतो' असे म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; केवळ मित्र मदतीला आला म्हणून...(Crime File Photo)
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७ अल्पवयीन मुलांनी एका ४२ वर्षीय तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा खून वाढदिवस साजरा करण्यासाठी करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या छडा लावण्यात पोलिसांना मृत व्यक्तीच्या मोबाईल फोनचा मोठा पुरावा ठरला. मृतकाचे नाव गणेश सखाहरी चत्तर (कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील रहिवासी आहे) हे ८ जूनपासून बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह नांदुर्खी बुद्रुक येथील उसाच्या शेतात सापडला. गणेश चत्तरच्या अंगावर पाठीवर धारधार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासद्वारे मृत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. चौकशीत समोर आले की मृताचा मोबाईल एका अल्पवयीन मुलाने साडेचार हजार रुपायांना विकला होता आणि त्याच पैश्यातून आरोपींनी वाढदिवसाची पार्टी केली होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
Nagpur Murders : उपराजधानी नागपुरात चाललंय तरी काय? अवघ्या २४ तासात ३ हत्या; शहरात खळबळ
नेमकं काय आहे प्रकरण?
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील 42 वर्षीय गणेश सखाहरी चत्तर हे 8 जूनपासून बेपत्ता होते. त्याच दरम्यान शिर्डी जवळील नांदुर्खी बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल 13 जून रोजी प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करायला सुरवात केली. मयत व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या मृताचा मोबाइल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला. दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाइल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला आणि त्यानंतर या खुनाला वाचा फुटली.
गणेश चत्तर हे काही रस्त्याने पायी जात होते, त्यावेळी त्यांचा अपहरण काही मुलांनी केला. नशेच्या अवस्थेत असलेल्या मुल्लाणी आधी त्यांना काठी, उसाच्या कांडक्याने व हातांनी मारहाण केली. त्यांनतर त्यांचा गळा दाबून आणि धारदार चाकूने हल्ला करून हत्या केली. यानंतर त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात ढेकूण दिला आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले. हा मोबाइल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला. याच मोबाईलच्या ट्रेकिंगमुळे पोलिसांनी सातही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. केवळ वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले आणि नंतर त्याचा खून करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या हत्येत ७ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे.