
'अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्...'; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास
कोर्टाने आरोपीला सुनावली 20 वर्षांची शिक्षा
५ हजार रुपये रक्कम पीडितेला देण्याचे कोर्टाचे आदेश
पीडितेला दिलेली जीवे मारण्याची धमकी
सिंधुदुर्गनगरी: आंब्याच्या बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विष्णूू प्रसाद डिल्ली कृष्ण न्यौपाने (६०) सध्या रा. कोचरा, वेंगुर्ला मूळ रा. नायरनमतलेस, पाल्पा, नेपाळ याला दोषी ठरवत विशेष न्यायाधीश श्रीम. व्हि. एस. देशमुख यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यातील ५ हजार रुपये रक्कम पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त (Sindhudurga) जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
या बाबत अधिक माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलगी ही ५ मार्च २०२५ रोजी आरोपी विष्णू यांच्याकडे मोबाईलवर कार्टून पाहण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने पीडितेला जेवण देऊन दुपारी जंगलमय भागातील बागेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगू नये आणि सांगल्यास मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या सांगण्यावरून वेंगुर्ला पोलीस ठाण्यात ७ मार्च २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…
या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, पीडिताची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायालयाने आरोपी विष्णू प्रसाद याला विविध कलमांखाली दोषी ठरवत २० वर्षे कारावाससह २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यातील ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
आईने उचलले भयंकर पाऊल
अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना सावंतवाडी तालुक्यातील माजगाव-गरड येथे दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.
Ratnagiri Crime: आईसह मुलाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; नेमका विषय काय?
मयत विवाहितेचे नाव प्रीती प्रल्हाद केतकर (पूर्वाश्रमीची तनुजा मनोहर बागडी) (वय २१) असे आहे. प्रीती यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील दुंडगे येथील आहे. एप्रिल २०२५ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना मुलगा झाला होता. मात्र २५ जानेवारी रोजी त्यांच्या तीन महिन्यांच्या बाळाचा निमोनियाने मृत्यू झाला, बाळाच्या निधनानंतर प्रीती या प्रचंड मानसिक धक्क्याखाली आणि नैराश्येत होत्या.