
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
वैशाली अनिल घोडके (35), श्रेया (12) आणि सोहम (10) असे या घटनेने खळबळ उडाली आहे. वैशाली घोडके या नेहमीप्रमाणे आपली श्रेया आणि सोहं याना सोबत घेऊन गावाजवळील साठवण तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. तिथे तिचे मुले आजूबाजूला खेळात असतांना किंवा आईला मदत करत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण पाण्यात घसरला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. तलावाकाठी पडलेले कपडे आणि मुलांच्या चपला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू झाले, सर्वात आधी वैशाली यांचा मृतदेह हाती लागला आणि एकच आक्रोश झाला.
तलावाची खोली आणि गाळ यामुळे चिमुकल्यांचा शोध घेणे कठीण जात होते. अखेर पंढरपूर येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. तासनतास सुरू असलेल्या या शोधकार्यात अखेर श्रेया आणि सोहम या दोघांचेही निष्पाप देह बाहेर काढण्यात आले. हे दृश्य पाहून घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांतूनही अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.
विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली. एका विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले. मात्र या अपघातावर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून हा घातपाताचा डाव असल्याचे म्हंटल आले. या प्रकरणी पोलिसात तिच्या शिक्षक पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माढा तालुक्यातील उपळाई खुर्द या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.
Ans: मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात.
Ans: साठवण तलावात बुडून मृत्यू झाला.
Ans: ग्रामस्थ आणि विशेष बचाव पथकाने शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले.