
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
१२ एप्रिल २०२६ रोजी केम येथील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला असलेल्या मकवानाच्या (मक्याच्या) गंजीच्या आडोशाला मल्हारी पोपट कांबळे (३८) यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात मल्हारी यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी अज्ञात व्यतींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नातेवाईक शीतल राजू केंगारे (बहीण) आणि राजेश बापू केंगारे (भावजी) यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली. यावेळी शीतल केंगारेने खुनाची कबुली दिली.
कशी केली हत्या?
११ एप्रिलच्या रात्री तो दारू पियुन घरी आला आणि बहिणीशी भांडण करू लागला. या रोजच्या त्रासाला कंटाळून संतापात शीतलने आपल्या ओढणीने मल्हारीचा गळा आवळला.यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शितल आणि तिचा पती राजेश या दोघांनी मिळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मल्हारीचा मृतदेह शेतात नेऊन टाकला होता. पोलिसांनी २४ तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे.
‘लग्न करतो’ म्हणत शोषण! तरुणीवर अत्याचार करून जबरदस्ती गर्भपात; काय घडलं नेमकं?.
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करून नंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Ans: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथे.
Ans: मृत व्यक्तीच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत वाद होत होते.
Ans: बहिण आणि तिच्या पतीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.