काय घडलं नेमकं?
वैष्णवी अनिल आवारे असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. रात्रीच्या वेळी सोसायटीजवळून जात असतांना एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर अचानक हल्ला केला. त्याने धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, वैष्णवी थेट रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. त्यांनतर तिथून हल्लेखोर फरार झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. हा संपूर्ण प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आम्हाला मारून टाकणार होते…; गाडी अडवून काचा फोडल्या, टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पर्यटक कुटुंबाने वाचवला जीव
नाशिकमधील प्रसिद्ध भावली धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटक कुटुंबासाठी सहलीचे रूपांतर थरारक अनुभवात झाले. महिलेला छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्यानंतर संतप्त झालेल्या काही तरुणांनी कुटुंबाचा तब्बल चार ठिकाणी पाठलाग करत गाडीची तोडफोड केली, दगड-रॉडने जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे. जीव वाचवण्यासाठी या कुटुंबाला टोलनाक्याचे बॅरिकेड तोडून पळ काढावा लागल्याचा धक्कादायक खुलासा कुटुंबांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून एक मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
Ans: वैष्णवी अनिल आवारे.
Ans: इंदिरानगर, नाशिक.
Ans: प्रेमप्रकरणातून हत्या.






