१०१ दिवसांनी दलित तरुणावर अंत्यसंस्कार
मृत तरुणाचे नाव आकाश असून त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाने सलग तीन महिने मृतदेहाला शवागृहातून नेण्यास नकार दिला. कुटुंबीयांनी कथित पोलीस कोठडीतील हत्येमध्ये सामील असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तथापि, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अखेर आकाशचे अंतिम संस्कार पार पाडण्यात आले.
शिवगंगा जिल्ह्यातील मानामदुरै येथील रहिवाली आकाशला स्थानिक पोलिसांनी ६ मार्च रोजी मारहाणीच्या प्रकरणात अटक केली. पोलिसांचा दावा होता की, पळण्याचा प्रयत्न करत असताना आकाशचा पाय फॅक्चर झाला. दुसरीकडे आकाशने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दाखल करून, पोलिसांनी आपल्याला निर्दयपणे मारहाण करून आपला पाय मोडल्याचा आरोप केला. यानंतर ८ मार्च रोजी मदुरैच्या सरकारी राजाजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आकाशच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. यानंतर जे रिपोर्ट्स समोर आले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. आकाशच्या शरीरावर २८ जखमा होत्या. खुलाशाने अनुसूचित जाती कल्याण संघटना आणि कुटुंबीयांकडून तीव्र आंदोलने सुरू झाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, ९ मार्च रोजी तपास सीबी-सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला. या प्रकरणानंतर एका निरीक्षक आणि उपनिरक्षकाला निलंबित करण्यात आले.
या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने १३ मार्च रोजी सीबी-सीआईडीला आरोपी अधिकाऱ्यांविरोधात हत्या आणि अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. यासोबतच ११ पोलिस अधिकाऱ्यांची चाैकशी करण्यात आली. यादरम्यान पिडित मुलाचे वडिल राजेश कन्नन यांनी उच्च न्यायालयाकडे ५० लाखंची भरपाई आणि १७ पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने मानामदुरैच्या जुन्या बसस्थानकाजवळ आंदोलने देखील केली.
Nashik Crime: कन्नमवार पुलाखालील आढळला सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; प्रेमसंबंधातून हत्येचा संशय
वाद मिटवण्यासाठी उच्च न्यायालयाने १५ जून रोजी आदेश दिला की संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जर कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतला नाही तर सम्मानजनक पद्धतीत स्थानिक प्रशासन त्याचे अंतिम संस्कार करेल. कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाने मदुरैचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर अंतिम संस्काराची जबाबदारी सोपवली. स्मशानात अंत्यविधी सुरु असताना गंभीर वातावरण निर्माण होते. आकाशची आई मुलाच्या मृत्यूवर प्रचंड रडली. तिने मूठभर वाळू हातात घेऊन पोलिस अधिकाऱ्यांवर फेकली आणि शाप दिला की, तिच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेले एके दिवशी पूर्णपणे नष्ट होतील.






