Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हे शाखेची पुनर्रचना; तपासाला मिळणार गती! चोरट्यांसाठी आता…

गुन्हे शाखेचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात गुन्हे शाखेच्या कामकाजात सुधार होईल, अशी अपेक्षा आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2025 | 01:04 PM
गुन्हे शाखेची पुनर्रचना; तपासाला मिळणार गती! चोरट्यांसाठी आता...

गुन्हे शाखेची पुनर्रचना; तपासाला मिळणार गती! चोरट्यांसाठी आता...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : वाढलेली गुन्हेगारी, तसेच शहर आयुक्तालयाची वाढलेली हद्द आणि अपुऱ्या मनुष्यबळ व महत्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षात गुन्हे शाखेला बंदोबस्त शाखा म्हणून मिळालेले उपहासात्मक मिळालेली पदवी पुसण्यासाठी आणि गुन्हे शाखेचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच मनुष्यबळ वाढवून गुन्हे शाखेतील काही प्रमुख पथकांना कुठलाही बंदोबस्त न देण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात गुन्हे शाखेच्या कामकाजात सुधार होईल, अशी अपेक्षा आहे.

राज्यभरात पुणे पोलिसांची गुन्हे शाखा नावाजलेली आहे. गेल्याच वर्षा-दीड वर्षांपुर्वी शाखेने मोठ-मोठ्या गुन्ह्यांचा छडा लावत जलदगतीने तपास पुर्ण केला होता. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, गँगस्टरच्या खूनातील आरोपींना आठ तासात अटक करणे, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरण, असे अनेक प्रकरणांचा तपास कौशल्याने व जलदगतीने पुर्णत्वास नेला होता. परंतु, काही पथके ही नावालाच होती. त्यांचे नेमके कामकाज काय? असा प्रश्न दस्तरखुद वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच पडला होता. वार्षिक आढावा घेतल्यानंतर दाखविण्यासाठी केलेल्या कामकाजाशिवाय ठोस असे काहीच नव्हते. वाहन चोरीचे ग्रहण पुण्याला लागून आता जवळपास दहा वर्षांचा काळ पुर्ण होत आहे. वाढत्या वाहन चोरीसाठी दोन खास पथके वाहन चोरींना पकडण्यासाठी आणि या घटनांना आळा घालण्यासाठी स्थापन केली होती. पण, त्यांची कामगिरीचा लेखाजोखा पाहिल्यानंतर ही पथके नेमकी करतात काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

यासोबतच काही आणखी अशी पथके फक्त नावालाच आहेत. त्यांच्याकडून ठोस असे काहीच नव्हते. तसा गुन्हेगारांवर खऱ्या अर्थांने गुन्हे शाखेचा दरारा असायला हवा. पण, गेल्या काही वर्षात गुन्हे शाखा म्हणजे, बंदोबस्त शाखा आणि वरिष्ठांनी दिलेल्या गुन्ह्यांचा तपास पुर्ण करण्यातच मग्न असते. एकाच गुन्ह्यात सर्व गुन्हे शाखा मागे लागते. त्यामुळे आपसूकच मुळ उद्देशच गुन्हे शाखेचा पुर्ण होत नाही. त्यासोबतच खास व महत्वाच्या घडामोडींवर देखील गुन्हे शाखेचे लक्ष असते. गुन्हेगारी वर्तुळात काय सुरू आहे, याची माहिती असणे आवश्यक असते. पण, सध्याच्या गुन्हे शाखेत असे काही उरलेले नाही.

त्यामुळे गुन्हे शाखेची पुनर्रचना आवश्यक होती. त्यासोबत काही ठरावीक टास्क त्यांना देणे, बंदोबस्त किंवा एखाद्या गुन्ह्यात सर्वच पथके सहभागी करणे हे बंद होणार आहे. नव्या गुन्हे शाखेच्या पुनर्रचनेत फक्त ‘फोकस’ कामकाज केले जाणार आहे.

गुन्हे शाखेचे प्रमुख सहा यूनिट आणि खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक यांची प्रत्येक दोन अशी सहा मिळून एकूण १२ पथके आहेत. शहरातील ३९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे शाखा यूनिटच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. गुन्ह्यांचा समांतर तपास केला जातो. त्यासाठी झोननिहाय यूनिटचे कामकाज वाटून दिलेले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहराची हद्द वाढली आहे. नव्याने सात पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहेत. वाढलेल्या पोलीस ठाण्यांमुळे काही यूनिटच्या कार्यकक्षेत वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता ही पुनर्रचना करण्यात येणार आहे.

काही यूनिटमध्ये अतिरीक्त पोलीस ठाण्यांचा समावेश केला जाईल. तर, काही यूनिटमधून पोलीस ठाणी वगळली जाणार आहेत. नागरिकांचा गुन्हे शाखेची जास्तीत जास्त कनेक्ट राहण्यासह शहराचा भौगोलिक विचार करून काही यूनिटची कार्यालये ही मध्यवर्ती भागात आणली जाणार आहेत. यामाध्यमातून समान कामकाजाचे वाटप आणि गुन्हे शाखेचे कामकाज प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

बंदोबस्त नसलेली तीन पथके

शहरात चैन स्नॅचिंग, वाहनचोरी, घरफोड्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी गुन्हे शाखेचे तीन स्वतंत्र पथक तयार केले असून, या पथकांच्या माध्यमातून अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एक अधिकारी आणि आठ ते दहा कर्मचार्‍यांचा या पथकांत समावेश असेल. ही पथके संपुर्ण शहरभर गस्त घालतील. विशेष म्हणजे या पथकांना प्रभावीपणे काम करता यावे, यासाठी कुठलाही बंदोबस्त किंवा इतर कामकाज देण्यात येणार नाही.

गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेतले आहे. वाढलेली शहराची हद्द, नव्याने तयार झालेली पोलीस ठाणी यांचा विचार करून ही पुनर्रचना केली जाईल. तर, अतिरीक्त मनुष्यबळासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. – शैलेश बलकवडे, अतिरीक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.

Web Title: The investigation will be accelerated as the crime branch will be restructured nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • cmomaharashtra
  • crime news
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.