
crime (फोटो सौजन्य: social media)
Beed Crime: आई-वडिलांच्या साध्या ओरडण्याचा मनावर घेतला धसका; 21 वर्षीय मुलाने संपवले जीवन
काय घडलं नेमकं?
मंगल प्रसाद उस्मानपुर बिगहरा या गावातील रहिवासी आहे. या गावातील रहिवासी मंगल प्रसाद हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री मंगल प्रसाद आपल्या तीन मुलांना घेऊन शेजारच्या गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरी त्यांची पत्नी सावित्री देवी आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मनू हे दोघेच होते. घरातील दैनंदिन कामे आटोपल्यानंतर सावित्री देवी यांनी रात्री नऊच्या सुमारास चुलीवर दूध गरम केले. दूध गरम झाल्यानंतर त्या पातेले घेऊन बाहेर ठेवण्यासाठी निघाल्या होत्या.
पायाला घट्ट मिठी मारली आणि…
तेव्हड्यात खेळत असलेला छोटा मनू धावत आला आणि त्याने आनंदाने आपल्या आईच्या पायाला घट्ट मिठी मारली. मुलाने अचानक पाय ओढल्यामुळे सावित्री देवी यांचा तोल गेला. सावरण्याचा प्रयत्न करेपर्यंत त्यांच्या हातातील उकळत्या दुधाचे पातेले थेट मनूच्या अंगावर पलटी झाले. उकळते दूध अंगावर पडताच मनू वेदनेने विव्हळू लागला आणि घरभर ओरडू लागला. आईने मदतीसाठी एकच टाहो फोडला.
रुग्णालयात नेत्यांना प्राणज्योत मालवली
मुलाचा आणि आईचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. तातडीने मनूला सरायअकिल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मनूला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात येत होते तेव्हा मनुची प्राणज्योत मालवली. मंगळवारी सकाळी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना आणि शवविच्छेदनाशिवाय कुटुंबियांनी मुलावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
Ans: आई उकळते दूध घेऊन जात असताना मुलाने तिच्या पायाला मिठी मारली. त्यामुळे तिचा तोल जाऊन उकळते दूध मुलाच्या अंगावर पडले.
Ans: प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेत असताना मुलाचा मृत्यू झाला.
Ans: पोलिसांना घटनेची माहिती मिळाली, मात्र कुटुंबियांनी कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही.