
फेसबुक मैत्रीतून तरुणीवर अत्याचार
अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
राजापूरमधील तरुनिवर अत्याचार
राजापूर: सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. यात राजापुरातील एका अल्पवयीन तरुणीला अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागले. या प्रकरणी राजापूर आणि वैभववाडी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मयूर सुर्वे, ओंकार सुर्वे आणि पंकज पवार या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या गंभीर प्रकरणाची पाश्र्वभूमी जुलै २०२५ पासून सुरू झाली. पीडित तरुणीची फेसबुकवर वैभववाडी येथील ओंकार सुर्वे याच्याशी ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत ओंकार आणि त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांनी तिला नापणे येथील धबधबा दाखवण्याच्या बहाण्याने नेले.
तिथे वेळ झाल्याचे सांगत तिला मयूरच्या जुन्या घरी नेण्यात आले आणि तिथेच या दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यादरम्यान त्यांनी पीडितेच्या नकळत मोबाईलवर तिचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड केले. यानंतर १४ मार्च रोजी पंकज पवार (रा. ताम्हाणे) याने हे अश्लिल व्हिडिओ पीडितेला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या सततच्या त्रासाला आणि मानसिक दडपणाला कंटाळून पीडितेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा विचार आपल्या बहिणीकडे बोलून दाखवला.
विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
मात्र, बहिणीने तिला वेळीच आधार दिला आणि धीर दिल्याने १५ मार्च रोजी तिने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने राजापूर पोलिसांनी ‘शून्य’ क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो वैभववाडीकडे वर्ग केला. पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास
आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
लांजा येथे ११ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणान्या नराधमाला रत्नागिरी सत्र न्यायालयाने जन्मठेप व २२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठालाली. आशिष अनिल जाधव(प २०, लांजा असे आरोपीचे नाव आहे १५ जुलै २०२३ रोजी येथे अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी लांजा पोलिसांकडून आशिष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंचाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले, मुद्यातील माहितीनुसार १५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पीडिता शाळेतून सुटल्यानंतर घरी चालत जात होती. यावेळी तिच्यासोबत शाळेतील दोन मुलं होती.