
पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय; मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
छत्रपती संभाजीनगर : लग्नसमारंभात पाहुण्यांना पंगत वाढणाऱ्या युवकाला दोन जणांनी बेदम मारहाण केली. तुझे नाव पत्रिकेत नाही, मग तू येथे काय करतोस? असा जाब विचारत युवकाला मंडपाबाहेर नेऊन शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार वस्तूने मानेवर, छातीवर आणि हातांवर वार करून जखमी केले. ही घटना २८ ते २९ एप्रिल दरम्यान शाहू गार्डन परिसरात घडली.
संघपाल जगन जवाळे आणि त्याचा एक साथीदार अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून, त्यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात शैलेश भानुदास कांबळे (वय ३२, रा. गल्ली नं. १४, आनंद नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पंडित नेहरू कॉलेजच्या मागील शाहू गार्डन येथे लग्नसमारंभ सुरू होता. शैलेश कांबळे हे नातेवाईकांच्या लग्नात पाहुण्यांना पंगत वाढण्याचे काम करत होते. त्यावेळी संघपाल व त्याचा एक साथीदार फिर्यादीजवळ आले. त्यातील एकाने गळ्यात हात टाकत त्यांना मंडपाबाहेर नेले. बाहेर नेताच आरोपींनी शैलेश कांबळे यांना तू नवरीचा कोण लागतोस? असा प्रश्न केला.
त्यावर कांबळे यांनी नवरीची आई माझी बहीण असून, नवरी माझी भाची आहे. आमचे घरच्यासारखे संबंध आहेत, असे सांगितले. मात्र, आरोपींनी मी घरचा असूनही माझे नाव पत्रिकेत नाही, मग तू येथे जेवण कसे वाढतोस? असे म्हणत वाद घालत शिवीगाळ सुरू केली. त्यावर ज्याच्या घरचे लग्न आहे, त्यांना विचार मला कशाला शिव्या देतो, असे म्हणाले. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी शैलेश कांबळे यांना मारहाण केली. या मारहाणीत शैलेश हे जखमी झाले आहेत.
बोरामणी गावात तिहेरी हत्याकांड
दुसरीकडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.