Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विधानसभेच्या निकालानंतर काहीतरी घडू शकतं, अजित पवार…’; ‘या’ नेत्याचं मोठं विधान

मागील 3-4 महिन्यांपासून शिवाजीनगर मानखुर्दची लोकं मला भेटायला येत होती. मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह होता. आज या मतदारसंघात ड्रग्सचा विळखा आहे. गुंडाची दहशत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2024 | 01:46 PM
‘विधानसभेच्या निकालानंतर काहीतरी घडू शकतं, अजित पवार…’; ‘या’ नेत्याचं मोठं विधान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला जेमतेम 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानुसार, अनेक नेतेमंडळींकडून विविध विधानं केली जात आहेत. अशातच आमदार नवाब मलिक यांनी भाष्य केलं. ‘राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. 2019 च्या निकालानंतर काय घडेल याचा अंदाज कुणी बांधला होता का? 2024 च्या निकालानंतरही काही घडू शकते. अजित पवार किंगमेकर राहतील, अशी खात्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : बंडोबा थंड होणार की…! उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस

नवाब मलिक यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यानुसार, आता ते निवडणूक लढवत आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘मागील 3-4 महिन्यांपासून शिवाजीनगर मानखुर्दची लोकं मला भेटायला येत होती. मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह होता. आज या मतदारसंघात ड्रग्सचा विळखा आहे. गुंडाची दहशत आहे. लोक दहशतीत जगत आहेत. पण मीच का असे विचारले असता याआधी जे कुणी निवडणूक लढवत होते, त्यांना दहशत दाखवून, खोटे गुन्हे दाखल करून बाजूला सारले जात होते.

याशिवाय, धमक्या आल्यानंतर ते गायब होतात. त्यामुळे तुम्ही कुठेतरी ताकदीने लढाल असा तिथल्या लोकांना विश्वास आहे. त्यामुळेच मी आता या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे, असेही नवाब मलिकांनी सांगितले. 2019 च्या विधानसभा निकालानंतर काय घडणार याचा अंदाज कुणी बांधला होता का, तसेच 2024 च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार, काहीही घडू शकते त्यात अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असतील, असा दावा आमदार नवाब मलिक यांनी केला आहे.

खोटे गुन्हे दाखल करून सारले जाते बाजूला

दरम्यान, मी 3 वेळा कुर्त्यातून आमदार होतो, वेळा अणुशक्तीनगरमधून आमदार होतो. आता मी तिसऱ्या जागेवरून निवडणूक लढवतोय जो अणुशक्तीनगरच्या बाजूला आहे. मला निवडणूक लढायची नव्हती. मी जेलमधून सुटल्यानंतर माझ्या मुलीने मतदारसंघात काम पाहिले. मी कार्यालयात बसल्यानंतर लोक तिला भेटायला यायचे. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही तिला उभं करू हे ठरवले.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! शरद पवारांना धक्का; ‘या’ नेत्याने सोडली राष्ट्रवादीची साथ, आता करणार…

Web Title: Ajit pawar will remain the kingmaker after election result nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 01:46 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • nawab malik
  • political news

संबंधित बातम्या

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा
1

पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात गदारोळ; गैरवर्तन केल्याप्रकरणी बाबाजानी दुर्राणींवर कारवाईचा बडगा

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”
2

Raghav Chadha आणि AAP मध्ये बिनसलं? पक्षनेतृत्वाला धरले धारेवर; म्हणाले, “माझी शांतता म्हणजे हार नाही..”

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची  मोठी मागणी
3

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची मोठी मागणी

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा
4

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.