Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विधानसभेच्या निकालानंतर काहीतरी घडू शकतं, अजित पवार…’; ‘या’ नेत्याचं मोठं विधान

मागील 3-4 महिन्यांपासून शिवाजीनगर मानखुर्दची लोकं मला भेटायला येत होती. मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह होता. आज या मतदारसंघात ड्रग्सचा विळखा आहे. गुंडाची दहशत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 04, 2024 | 01:46 PM
‘विधानसभेच्या निकालानंतर काहीतरी घडू शकतं, अजित पवार…’; ‘या’ नेत्याचं मोठं विधान
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला जेमतेम 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानुसार, अनेक नेतेमंडळींकडून विविध विधानं केली जात आहेत. अशातच आमदार नवाब मलिक यांनी भाष्य केलं. ‘राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. 2019 च्या निकालानंतर काय घडेल याचा अंदाज कुणी बांधला होता का? 2024 च्या निकालानंतरही काही घडू शकते. अजित पवार किंगमेकर राहतील, अशी खात्री असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : बंडोबा थंड होणार की…! उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस

नवाब मलिक यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यानुसार, आता ते निवडणूक लढवत आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘मागील 3-4 महिन्यांपासून शिवाजीनगर मानखुर्दची लोकं मला भेटायला येत होती. मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह होता. आज या मतदारसंघात ड्रग्सचा विळखा आहे. गुंडाची दहशत आहे. लोक दहशतीत जगत आहेत. पण मीच का असे विचारले असता याआधी जे कुणी निवडणूक लढवत होते, त्यांना दहशत दाखवून, खोटे गुन्हे दाखल करून बाजूला सारले जात होते.

याशिवाय, धमक्या आल्यानंतर ते गायब होतात. त्यामुळे तुम्ही कुठेतरी ताकदीने लढाल असा तिथल्या लोकांना विश्वास आहे. त्यामुळेच मी आता या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे, असेही नवाब मलिकांनी सांगितले. 2019 च्या विधानसभा निकालानंतर काय घडणार याचा अंदाज कुणी बांधला होता का, तसेच 2024 च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार, काहीही घडू शकते त्यात अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असतील, असा दावा आमदार नवाब मलिक यांनी केला आहे.

खोटे गुन्हे दाखल करून सारले जाते बाजूला

दरम्यान, मी 3 वेळा कुर्त्यातून आमदार होतो, वेळा अणुशक्तीनगरमधून आमदार होतो. आता मी तिसऱ्या जागेवरून निवडणूक लढवतोय जो अणुशक्तीनगरच्या बाजूला आहे. मला निवडणूक लढायची नव्हती. मी जेलमधून सुटल्यानंतर माझ्या मुलीने मतदारसंघात काम पाहिले. मी कार्यालयात बसल्यानंतर लोक तिला भेटायला यायचे. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही तिला उभं करू हे ठरवले.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! शरद पवारांना धक्का; ‘या’ नेत्याने सोडली राष्ट्रवादीची साथ, आता करणार…

Web Title: Ajit pawar will remain the kingmaker after election result nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 01:46 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • nawab malik
  • political news

संबंधित बातम्या

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
1

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
2

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
3

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
4

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.