
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भावनिक मोशन पोस्टरनंतर आता ‘बंटवारा 1947’च्या निर्मात्यांनी चित्रपटातील प्रमुख पात्रांचे पोस्टर्स प्रेक्षकांसमोर आणले आहेत. या पोस्टर्समधून फाळणीच्या काळातील वेदना, संघर्ष आणि कठीण परिस्थितीतही टिकून राहिलेल्या मानवी जिद्दीची झलक पाहायला मिळते.
Aamir Khan Productionsच्या बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपट इतिहासातील एका महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील कालखंडाची कथा मांडणार आहे. जग उद्ध्वस्त होत असतानाही आशा, धैर्य आणि मानवतेचा आधार घेऊन उभ्या राहिलेल्या लोकांची कहाणी यात दाखवण्यात येणार आहे.
चित्रपटातील पात्रांचे पोस्टर्स नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून त्यातून या कथाविश्वाची ओळख करून देण्यात आली आहे. Shabana Azmi दुर्गावती देवी (माई), Sunny Deol सिकंदर मिर्झा, Preity Zinta हमीदा बेगम, Karan Deol जावेद मिर्झा, Ali Fazal हबीब अन्वर आणि Abhimanyu Singh याकूब खान या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही पात्रं अशा लोकांची कथा सांगतात, ज्यांनी फाळणीसारख्या कठीण काळातही हार मानली नाही.
या पोस्टरमधून केवळ पात्राची ओळख नाही, तर त्यामागील संघर्ष, भावना आणि जिद्दीची झलकही पाहायला मिळते. प्रत्येक पात्राचा चेहरा त्याच्या मनातील भावना आणि त्या काळातील परिस्थिती सांगताना दिसत आहे.
चित्रपटाची ताकद ही केवळ त्याच्या भव्य कथेत नसून, पात्रांच्या भावनिक प्रवासात आणि त्यांच्या समर्पणात असल्याचे या पोस्टर्समधून जाणवते. त्यामुळे फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक Rajkumar Santoshi दिग्दर्शित ‘बंटवारा 1947’ हा चित्रपट जवळपास तीन दशकांनंतर Rajkumar Santoshi आणि Sunny Deol यांच्या पुनरागमनाचा खास योग घेऊन येणार आहे.
Aamir Khan Productionsच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती Aamir Khan आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. चित्रपटाचे संगीत A. R. Rahman यांनी दिले असून गीतलेखन Javed Akhtar यांनी केले आहे.फाळणीच्या काळातील मानवी नातेसंबंध, संघर्ष आणि आशेची कथा सांगणारा ‘बंटवारा 1947’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.