
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हिने NEET पेपरफुटी प्रकरणावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीतील जंतर मंतर ईथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला मराठी कलाकरांसह अनेक बॉलिवूड कलाकरांनी पाठिंबा दर्शवला होता. अनेक जणांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री करीना कपूर हिने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे तसेत विद्यार्थ्यांचा आवाज आपण ऐकायला हवा असं देखील तिने सांगितले आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना करीना म्हणाली की, या विषयावर बोलण्यापूर्वी तिने काही दिवस विचार केला. मात्र, “इतक्या तरुणांचा आवाज दुर्लक्षित करता येणार नाही आणि तसे होऊही नये,” असे ती म्हणाली.
शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत करीना पुढे म्हणाली, “शिक्षण मुलांना आत्मविश्वास देते, आशा देते आणि कुटुंबांना उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल, असा विश्वास दोतो.”.
तिने विद्यार्थ्यांच्या मेहनतीबाबत चिंता व्यक्त करत म्हटले की, “कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्या मेहनतीवर शंका घेण्याची वेळ येऊ नये. प्रत्येक मुलाला अशा व्यवस्थेचा अधिकार आहे, ज्यावर तो विश्वास ठेवू शकेल. जिथे गुणवत्तेला न्याय मिळेल, मेहनतीचे फळ मिळेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळेल. ही फार मोठी अपेक्षा नसून किमान गरज आहे.”
Gen Z विद्यार्थ्यांचा उल्लेख करत करीना म्हणाली, “जेव्हा संपूर्ण पिढी आपल्या भविष्यासाठी एकाच आवाजात बोलते, तेव्हा त्यांचे म्हणणे ऐकणे ही कृपा नसून आपली जबाबदारी असते. आज आपण कशी प्रतिक्रिया देतो, यावरून मुलांचा न्याय आणि विश्वासावरील भरोसा ठरणार आहे.”
दरम्यान, २३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर जलद आणि कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी, “तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही,” असा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले.
दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयाने २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद चलो’ आंदोलनाच्या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. या याचिकेत या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे सोपवण्याची तसेच हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.