Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे

The India Story - द इंडिया स्टोरी' चित्रपटाविषयी बोलताना श्रेयस तळपदे यांनी अन्नातील भेसळ, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि ऑर्गेनिक शेतीची गरज यावर भाष्य केले. 'हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.

  • By Dilip Bane
Updated On: Jul 16, 2026 | 02:42 PM
द इंडिया स्टोरी'वर श्रेयस तळपदेंची प्रतिक्रिया , The India Story

द इंडिया स्टोरी'वर श्रेयस तळपदेंची प्रतिक्रिया , The India Story

Follow Us
Follow Us:
  • ‘द इंडिया स्टोरी’वर श्रेयस तळपदेंची प्रतिक्रिया
  • अन्नातील भेसळीवर व्यक्त केली चिंता
  • ‘ऑर्गेनिक क्रांती’ची गरज असल्याचे मत
  • “हे असंच सुरू राहिलं तर कोणीही वाचवू शकत नाही”
  • चित्रपटामुळे बदलल्या खाण्याच्या सवयी
  • सैनिकाच्या संघर्षाची भावनिक कथा
अभिनेता श्रेयस तळपदे यांचा आगामी ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला जागं करणारा चित्रपट ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. २४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अन्नातील रासायनिक विषारी घटक, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि त्याचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली.

‘या चित्रपटानंतर मी काय खातो याचा गंभीरपणे विचार करू लागलो’

‘द इंडिया स्टोरी’ची कथा ऐकल्यानंतर स्वतःच्या जीवनातही मोठा बदल झाल्याचे श्रेयस तळपदे यांनी सांगितले.त्यांनी म्हटले, “या चित्रपटाचे काम सुरू केल्यापासून मी माझ्या खाण्यापिण्याकडे खूप गांभीर्याने पाहू लागलो. आधी मी कधीच एवढा विचार करत नव्हतो. आज घरातलं अन्न खातानाही हा भाजीपाला कुठून आला, त्यामध्ये किती कीटकनाशके आहेत, हे मनात येतं.”ते पुढे म्हणाले की, आता घरी भाज्या योग्य प्रकारे स्वच्छ धुतल्या आहेत का, याचीही ते खात्री करून घेतात.

‘हे असंच सुरू राहिलं तर आपण नष्ट होऊ’

देशातील शेती आणि अन्न उत्पादनाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना श्रेयस यांनी स्पष्ट इशारा दिला.”आज ज्या पद्धतीने रासायनिक शेती सुरू आहे, ती अशीच सुरू राहिली तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. आपल्या पुढच्या पिढीला वाचवायचं असेल तर आताच पावलं उचलावी लागतील,” असे ते म्हणाले.त्यांच्या मते, हरित क्रांतीनंतर आता देशात ‘ऑर्गेनिक क्रांती’ घडण्याची गरज आहे.

मर्दिनी सिनेमाचे नवीन गाणे प्रदर्शित! ‘महिषासुर मर्दिनी’; ऐकताच हात जोडत भक्तीत लीन झाला निर्माता श्रेयस तळपदे

‘ही कथा प्रत्येक घराशी संबंधित आहे’

श्रेयस तळपदे यांनी सांगितले की, दिग्दर्शक चेतन यांनी जेव्हा त्यांना ही कथा ऐकवली, तेव्हाच हा चित्रपट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.त्यांच्या मते, एका सामान्य कुटुंबावर अन्नातील विषारी घटकांचा कसा परिणाम होतो, हे या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे.”ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं मला वाटलं. अशा चित्रपटाचा भाग होण्याचं भाग्य मला मिळालं,” असे त्यांनी सांगितले.

भारतीय लष्करातील मेजरच्या भूमिकेत श्रेयस तळपदे

या चित्रपटात श्रेयस तळपदे भारतीय लष्करातील मेजरची भूमिका साकारत आहेत.आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, देशासाठी दहशतवाद्यांशी लढणारा हा अधिकारी स्वतःच्या कुटुंबावर संकट आल्यानंतर पूर्णपणे हतबल होतो.”हे पात्र साकारताना अनेक प्रसंग अतिशय भावनिक होते. काही वेळा मी अभिनय करतोय हेही विसरून जायचो. त्या व्यक्तीच्या वेदना स्वतः अनुभवत असल्यासारखं वाटायचं,” असे त्यांनी सांगितले.

गावाकडच्या लेखक-दिग्दर्शकांचे कौतुक-चित्रपटाचे लेखक सागर शिंदे आणि दिग्दर्शक चेतन यांचे श्रेयस यांनी विशेष कौतुक केले.त्यांच्या मते, दोघेही ग्रामीण पार्श्वभूमीचे आणि शेतीशी जोडलेले असल्यामुळे या विषयाची खरी जाणीव त्यांना आहे.”अशा विषयावर चित्रपट बनवण्यासाठी धैर्य लागतं. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ही समस्या त्यांनी जवळून पाहिली आहे. त्यामुळे ही कथा पडद्यावर आणण्याची त्यांची तळमळ स्पष्ट दिसते,” असे श्रेयस म्हणाले.

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’ मधील भूमिकेसाठी करण सोनावणेने गिरवले मालवणीचे धडे; प्रेक्षकांना दिसणार नवा अंदाज

‘मनोरंजनासोबत प्रबोधनही तितकेच महत्त्वाचे’आजच्या काळात मनोरंजनप्रधान चित्रपटांची संख्या मोठी असली तरी समाजप्रबोधन करणारे चित्रपट फार कमी असल्याचे श्रेयस यांनी नमूद केले.”सिनेमा हा केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर समाजाला विचार करायला भाग पाडणारे प्रभावी माध्यम आहे. ‘द इंडिया स्टोरी’ हा त्याच प्रकारचा चित्रपट आहे,” असे ते म्हणाले.प्रेक्षकांना केलेलं आवाहन- प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा, असे आवाहन करताना श्रेयस म्हणाले,”हा चित्रपट केवळ अन्नातील भेसळ दाखवत नाही, तर एका निष्पाप कुटुंबाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं, हेही दाखवतो. चित्रपटाच्या शेवटी एका चिमुकलीचा संदेश प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडेल.”

२४ जुलैला प्रदर्शित होणार ‘द इंडिया स्टोरी’

‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट २४ जुलै रोजी तीन भाषांमध्ये देशभर प्रदर्शित होणार आहे. अन्नातील भेसळ, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि त्याचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम या विषयावर आधारित हा चित्रपट समाजात मोठी जनजागृती घडवून आणेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

Web Title: Marathi bollywood shreyas talpade the india story interview in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • bollywood movies
  • marathi movie
  • shreyas talpade

संबंधित बातम्या

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’ मधील भूमिकेसाठी करण सोनावणेने गिरवले मालवणीचे धडे; प्रेक्षकांना दिसणार नवा अंदाज
1

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’ मधील भूमिकेसाठी करण सोनावणेने गिरवले मालवणीचे धडे; प्रेक्षकांना दिसणार नवा अंदाज

दत्तभक्तीचा सुरेल सोहळा! १२ वर्षांनंतर पं. अजित कडकडे यांचं पुनरागमन; ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ भक्तिगीत प्रदर्शित
2

दत्तभक्तीचा सुरेल सोहळा! १२ वर्षांनंतर पं. अजित कडकडे यांचं पुनरागमन; ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ भक्तिगीत प्रदर्शित

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित
3

Samarth Teaser Out: समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक स्पर्श; ‘समर्थ’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित

२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना
4

२५ वर्षांनंतर रंगभूमीवर नवाजुद्दीन सिद्दीकींची घरवापसी; ‘नकाब’साठी मुलगी शोरासोबत शिकागोला रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.