
फोटो सौजन्य - Social Media
Rajesh Sharma Health Update : किडा नाही तर ‘या’ कारणामुळे अभिनेत्याची खालावली होती तब्येत!
काय म्हणाले प्रवीण तरडे?
Deool Band 2 सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना एका मुलाखती दरम्यान जेव्हा ‘Deool Band 2 तर देवाच्या नावावरून चालला!’ अशा काही प्रेक्षकांच्या मताविषयी सांगण्यात आले तेव्हा प्रवीण तरडे यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले. प्रवीण म्हणाले की “एखादा सिनेमा तयार करण्यासाठी फक्त सिनेमाचा विषय महत्वाचा नसतो. तर त्या सिनेमाची कथा, त्या कथेची मांडणी आणि त्यामागचे प्रामाणिक प्रयत्न या सर्व बाबींनाही तितकेच महत्व असते.” प्रवीण सांगतात की “एखादा सिनेमा देवाच्या नावाने चालला असे म्हणणे, हा चुकीचा समज आहे.”
शाहरुख खानने देऊळबंद 2 सिनेमासाठी केलेली मदत या मुद्द्यावरूनही प्रवीण यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी प्रवीण तरडे यांनी धर्माच्या नावाने ट्रोलिंग करणाऱ्या त्या प्रत्येकाला सडेतोड उत्तर दिले की “शाहरुख खानने केलेली मदत धर्माच्या चष्म्यातून न पाहता त्यांनी दाखवलेल्या चांगुलपणाचे कौतुक करावे.”
Deool Band या सिक्वेलमध्ये पुढे आणखीन भाग येतील, असे स्वतः प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते. तसेच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी स्वतः स्पष्ट केले होते की ‘देऊळबंद 3’ सिनेमाची शूटिंग कोकणातील गुहागर येथे होणार आहे. त्यामुळे स्वामींची कोकणात असणारी लीला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या प्रेक्षक ‘मुळाशी पॅटर्न 2’ सिनेमाची वाट पाहत आहेत.