फोटो सौजन्य - Social Media
फौजी सिनेमाच्या टीमचे म्हणणे आहे की सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते राजेश शर्मा यांच्या प्रकृतीत कोणताही बिघाड झाला नव्हता. अशी कोणतीही बातमी आमच्या प्रोडक्शनच्या एकाही माणसाच्या कानावर आली नव्हती. मुळात, राजेश आठवड्याभरापूर्वीच आपल्या वाटणीचे शूटिंग पूर्ण करून घराकडे निघाले होते. त्यांच्या तब्येतीविषयी माहिती पडताच सिनेमाच्या टीमने राजेश यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा लाख प्रयत्न केला. परंतु, तिथून काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही.
अशामध्ये राजेश शर्मा यांच्या PA ने सत्यस्थिती समजावून सांगितली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “राजेश यांना मधुमेहामुळे त्रास झाला होता. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. परंतु, त्यांच्या प्रकृतीत आता सुधार झाला असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.”
Simulacra movie: आठवणी बदलल्या तर प्रेम टिकेल का? ‘सिम्युलाक्रा’मधून उलगडणार भविष्यकालीन प्रेमकथा
सिनेक्षेत्रातून व्यक्त करण्यात आली चिंता!
अभिनेते राजेश शर्मा यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याचे माहिती पडताच सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांनी चिंता व्यक्त केली. अक्षय कुमारने खास पोस्ट लिहीत शेअर केले की, “माझ्या मित्राला कीटक चावला आणि त्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. पण शंकराच्या आशीर्वादाने तो लवकर ठीक होईल. मित्रा राजेश! लवकर बरा हो रे… अजून आपल्याला सोबत खूप हसायचं आहे.”






