
फोटो सौजन्य - Social Media
उषा चव्हाण यांनी वारंवार शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि संबंधित विभागांकडे तक्रारी दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्कांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. उषा चव्हाण यांनी याबाबत प्रेस नोट जाहीर केले आहे तसेच मराठी रंगमंचासाठी तसेच सिनेसृष्टीसाठी आयुष्यभर योगदान दिले तरीही महाराष्ट्राच्या सरकारकडून त्यांना अपेक्षित न्याय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या सर्व मानचिन्हांना, Awards तसेच पुरस्कारांना आनंद दिघे समाधीस्थळी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणणं आहे उषा चव्हाणांचं!
जेष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचे म्हणणे आहे की, “माझ्या कुटुंबीयांच्या मालमत्तेशी संबंधित टीडीआर प्रकरणात आमच्यावर अन्याय झाला आहे. संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचे आणि हृदयनाथ कडू देशमुख (उषा चव्हाण यांचा मुलगा) यांचा त्यात कायदेशीर हिस्सा असल्याचे स्वतः उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. तरीही पुणे महानगपालिकेने एकूण १५,०६६ चौ.मी. टीडीआर Ganga Goel India Pvt. Ltd. या बिल्डर कंपनीला दिला.” उषा चव्हाण यांनी पुढे नमूद केले आहे की, “न्यायालयीन आदेश, प्रलंबित वाद आणि त्यांनी दिलेल्या लेखी हरकती दुर्लक्षित करून DRC जारी करण्यात आले. याबाबत आम्ही पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीदेखील केल्या, परंतु आम्हाला काहीच न्याय मिळाला नाही.”
या सगळ्या नाराजीमध्ये उषा चव्हाण म्हणतात की, “हा फक्त माझा किंवा माझ्या कुटुंबाचा प्रश्न नव्हे, हा सामान्य नागरिकांच्या मालमत्ता हक्काचा प्रश्न आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र शासनाने दिलेले पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मान परत करेल आणि गरज भासली तर ते स्व. आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी अर्पण करेल.” जेष्ठ अभिनेत्री Usha Chavan यांना शासनाकडून न्याय मिळणार का? याकडे पाहणे महत्वाचे ठरेल.