
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेने नुकताच १८०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही मालिका आता एका अत्यंत भावनिक आणि थरारक वळणावर येणार आहे.कथानकात वेदच्या प्रकृतीवर गंभीर संकट ओढवल्याने अंबादास आणि रेणुका पूर्णपणे खचून जातात. मार्तंड महाराजांनी सुचवलेले उपाय निष्फळ ठरतात. अशा वेळी स्वामी वेदच्या आईकडून पुण्याचे काम करून घेतात आणि अंबादासला अखंड प्रदक्षिणा घालून प्रार्थना करण्यास सांगतात—जणू त्यांच्या श्रद्धेचीच परीक्षा सुरू असते.
दरम्यान, वेदची प्रकृती अधिकच खालावत जाते आणि शेवटी तो प्राण सोडतो. या प्रसंगामुळे अंबादास आणि रेणुका यांना मोठा धक्का बसतो. आई-वडिलांचा आक्रोश, असहाय्यता आणि श्रद्धेचा संघर्ष हा प्रसंग प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे.याच वेळी वेदकडे येणारी यमाची सावली सर्वांना दिसू लागते. या संकटाचा सामना करण्यासाठी स्वामी भव्य महाकाळ रूप धारण करणार आहेत, ज्यामुळे कथेला आणखी थरारक वळण मिळणार आहे.हा विशेष ‘महानिर्वाण’ अध्याय २१ आणि २२ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.
या संकटाच्या क्षणी वातावरणात एक अदृश्य, भयावह शक्ती सक्रिय असल्याची जाणीव सगळ्यांना होते. परिस्थिती हाताबाहेर जात असताना स्वामी मात्र विलक्षण शांत राहून एक अनपेक्षित विधी करण्याचे निर्देश देतात. त्यांच्या या निर्णयामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम आणि तणाव निर्माण होतो. जसजसा प्रसंग पुढे सरकतो, तसतसं आध्यात्मिक आणि दिव्य शक्तींचं दर्शन घडू लागतं आणि घटनाक्रम एका मोठ्या, अनपेक्षित वळणाकडे झुकताना दिसतो.
अबब…! ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग! Salman चं Transformation पाहून तरुणी झाले घायाळ
या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामींच्या रूपातून प्रकट होणारी दिव्यता, श्रद्धेची ताकद आणि नशिबाशी चाललेली झुंज यांचा प्रभावी संगम प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. जय जय स्वामी समर्थ मालिकेतील हा अध्याय अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.वेदवर आलेलं संकट नेमकं कसं टळणार? त्याचा जीव वाचणार का? स्वामी या परिस्थितीत कशाप्रकारे हस्तक्षेप करणार? आणि अंबादास-रेणुकाची श्रद्धा या कठीण परीक्षेत टिकून राहणार का?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा उत्कंठावर्धक भाग नक्की पाहायला हवा.